भटक्या कुत्र्यांची जबाबदारी आता प्राणीमित्र संस्थांकडे!

मुंबई  : औरंगाबाद महापालिकेच्या धर्तीवर शहरातील भटक्या कुत्र्यांना कोंडवाड्यात ठेवावे आणि नंतर ते प्राणीमित्र संस्थांना दत्तक म्हणून द्यावे, अशी ठरावाची सूचना मुंबई महापालिकेत करण्यात आली आहे. या ठरावाला पालिका सभागृहाची मंजुरी मिळाली व त्यावर पालिका आयुक्त यांनी सकारात्मक अभिप्राय दिल्यास त्याची लवकरच अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.

भटक्या जनावरांप्रमाणेच भटक्या कुत्र्यांचाही मुंबईकरांना पहाटे व रात्रीच्या सुमारास खूप त्रास होत असतो. त्यामुळे अशा भटक्या कुत्र्यांना व त्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी सामाजिक संस्थांमार्फत मुंबई महापालिका त्यांचे निर्बीजीकरण करते. मात्र अद्यापही भटक्या कुत्र्यांची समस्या सुटलेली नाही. ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी भटकी गुरे, जनावरे यांच्यासाठी असलेल्या कोंडवाड्यांप्रमाणे भटक्या कुत्र्यांसाठीही आवश्यक त्या ठिकाणी कोंडवाडे उभारण्यात यावेत. ज्या प्रमाणे वाघांना दत्तक दिले जाते त्याप्रमाणेच या कोंडवाड्यात ठेवण्यात येणाऱ्या भटक्या कुत्र्यांना प्राणीमित्र संस्थांना दत्तक म्हणून जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

मुंबईत भटक्या जनावरांमुळे रस्त्यावर वाहतुकीला व पादचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. त्यामुळे पालिकेने अशा मोकाट व भटक्या गुरांना, जनावरांना पकडून त्यांचा सांभाळ व देखभाल करण्यासाठी कोंडवाड्याची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये त्या जनावरांचे मालक येऊन दंडाची रक्कम भरून त्यांना सोडवून नेईपर्यंत कोंडवाड्यात ठेवण्यात येते.
Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील