बस बंद असल्याने विद्यार्थ्यांची खासगी वाहनांकडे धाव

वाडा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्याने वाडा आगारातील दोनशेपेक्षा जास्त कर्मचारी संपात सहभागी झाल्याने वाडा आगारातील फक्त सहा बस रस्त्यावर धावत आहेत. त्या ग्रामीण भागात चालतात. मात्र, अंबाडी, कुडूस, नेहरोली, मनोर, कंचाड, गारगाव, परळी, तीळसा व तालुक्यच्या अती दुर्गम भागातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रोज शिकण्याच्या निमित्ताने वाड्यात येत आहेत. राज्य परिवहनच्या बस बंद असल्याने अशा विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून त्यांना खासगी वाहनांकडे धाव घ्यावी लागत आहे.



सुरुवातीला वर्गातील निम्म्या विद्यार्थ्यांना व उर्वरित दुसऱ्या दिवसी शाळेत बोलावले जायचे. मात्र, आता नियमितपणे शाळा सुरू झाल्याने विध्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती लागत आहे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची गर्दीही वाढली आहे. तथापि, बस बंद असल्यामुळे लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे. यासाठी बस सेवा लवकरात लवकर सुरू होण्याची मागणी पालकांकडून होत आहे.



कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. यापुढे ते होऊ नये यासाठी शासकीय स्तरावर संपावर तोडगा काढून बस सेवा पूर्ववत चालू करावी. - अनंता वणगा, अध्यक्ष, आदिवासी मुक्ती संघटना

Comments
Add Comment

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब

Student Threatened For Conversion : धर्मांतरासाठी विद्यार्थ्याला धमकी, तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

मुंबई : बोरीवली (पूर्व) येथे कराटेच्या क्लासला जात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला भररस्त्यात थांबवून

Maharashtra Lok Bhavan : महाराष्ट्राचे ‘राजभवन’ झाले ‘लोकभवन’; अधिसूचना जारी!

मुंबई : केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘लोक कल्याण मार्ग’ आणि ‘पीएम हाऊस’ ऐवजी ‘लोकभवन’ असे