बस बंद असल्याने विद्यार्थ्यांची खासगी वाहनांकडे धाव

वाडा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्याने वाडा आगारातील दोनशेपेक्षा जास्त कर्मचारी संपात सहभागी झाल्याने वाडा आगारातील फक्त सहा बस रस्त्यावर धावत आहेत. त्या ग्रामीण भागात चालतात. मात्र, अंबाडी, कुडूस, नेहरोली, मनोर, कंचाड, गारगाव, परळी, तीळसा व तालुक्यच्या अती दुर्गम भागातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रोज शिकण्याच्या निमित्ताने वाड्यात येत आहेत. राज्य परिवहनच्या बस बंद असल्याने अशा विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून त्यांना खासगी वाहनांकडे धाव घ्यावी लागत आहे.



सुरुवातीला वर्गातील निम्म्या विद्यार्थ्यांना व उर्वरित दुसऱ्या दिवसी शाळेत बोलावले जायचे. मात्र, आता नियमितपणे शाळा सुरू झाल्याने विध्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती लागत आहे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची गर्दीही वाढली आहे. तथापि, बस बंद असल्यामुळे लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे. यासाठी बस सेवा लवकरात लवकर सुरू होण्याची मागणी पालकांकडून होत आहे.



कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. यापुढे ते होऊ नये यासाठी शासकीय स्तरावर संपावर तोडगा काढून बस सेवा पूर्ववत चालू करावी. - अनंता वणगा, अध्यक्ष, आदिवासी मुक्ती संघटना

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती