बस बंद असल्याने विद्यार्थ्यांची खासगी वाहनांकडे धाव

वाडा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्याने वाडा आगारातील दोनशेपेक्षा जास्त कर्मचारी संपात सहभागी झाल्याने वाडा आगारातील फक्त सहा बस रस्त्यावर धावत आहेत. त्या ग्रामीण भागात चालतात. मात्र, अंबाडी, कुडूस, नेहरोली, मनोर, कंचाड, गारगाव, परळी, तीळसा व तालुक्यच्या अती दुर्गम भागातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रोज शिकण्याच्या निमित्ताने वाड्यात येत आहेत. राज्य परिवहनच्या बस बंद असल्याने अशा विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून त्यांना खासगी वाहनांकडे धाव घ्यावी लागत आहे.



सुरुवातीला वर्गातील निम्म्या विद्यार्थ्यांना व उर्वरित दुसऱ्या दिवसी शाळेत बोलावले जायचे. मात्र, आता नियमितपणे शाळा सुरू झाल्याने विध्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती लागत आहे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची गर्दीही वाढली आहे. तथापि, बस बंद असल्यामुळे लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे. यासाठी बस सेवा लवकरात लवकर सुरू होण्याची मागणी पालकांकडून होत आहे.



कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. यापुढे ते होऊ नये यासाठी शासकीय स्तरावर संपावर तोडगा काढून बस सेवा पूर्ववत चालू करावी. - अनंता वणगा, अध्यक्ष, आदिवासी मुक्ती संघटना

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल