ITR दाखल करण्यासाठी मुदतवाढीची मागणी

मुंबई : आर्थिक वर्ष 2020-21 करीता आयकर विवरणपत्र दाखल  (Income Tax Return filing)करण्यासाठी आता शेवटचे काही दिवस उरले आहेत. तर, दुसरीकडे आयकर खात्याच्या वेबपोर्टलविरोधात असंतोष वाढत आहे. ITR दाखल करण्यासाठी शेवटची मुदत 31 डिसेंबर आहे. ही मुदत वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी सोशल मीडियावर #Extend_Due_Date_Immediately हा हॅशटॅग ट्रेंडही करण्यात आला.

केंद्र सरकारने याआधी Income Tax Return दाखल करण्याची मुदत ही 31 जुलैहून 30 सप्टेंबर आणि त्यानंतर आता 31 डिसेंबर केली होती.  Income Tax Return दाखल करताना वेबसाइटवर येणाऱ्या अडचणींमुळे काही दिवस साइट बंद होती. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा करदात्यांनी मुदतवाढीची मागणी केली आहे. आताही ITR दाखल करताना वेबसाइटमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.

सीए, वैयक्तिरीत्या ITR दाखल करणाऱ्यांनी सोशल मीडियावर #Extend_Due_Date_Immediately हा हॅशटॅग ट्रेंड केला. अनेकांनी उपरोधिकपणे सरकारवर  टीकाही केली आहे. एका ट्विटर युजरने म्हटले की, 31 डिसेंबर ही शेवटची मुदत ITR चे सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्यांसाठी आहे. करदात्यांना पुरेसा वेळ न मिळाल्याने ही मुदत करदात्यांसाठी नाही, असेही त्यांनी म्हटले. अनेकांनी मीम्सही तयार केले आहेत.


Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही