नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात खारेगाव उड्डाणपुलाचे लोकार्पण

ठाणे: कळवा येथील पूर्व आणि पश्चिम भागातील वाहनचालकांसोबतच रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाचा असलेल्या खारेगाव येथील रेल्वेवरील पुलाचे नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात लोकार्पण केले जाणार आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून त्याचा वापर सुरू केला जाईल, अशी माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या पुलामुळे रेल्वेचे खारेगाव येथील फाटक बंद होणार असून त्यामुळे येथे होणारी वाहतूक कोंडी संपणारआहे. तसेच रेल्वेची पाचवी आणि सहावी मार्गिकाही खुली होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढून वाहतूक व्यवस्था गतीमान होऊन प्रवाशांना त्याचा थेट फायदा होणार आहे.



कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कळवा पूर्व आणि पश्चिम, खारेगाव, विटावा या भागांतील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी आवश्यक असलेल्या रेल्वेवरील पूलाचे काम गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू आहे. या कामांचा आढावा घेण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी कामाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्केही उपस्थित होते. खारेगाव येथील पूल प्रवाशांसाठी महत्वाचा असून त्यामुळे येथील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. अपघातांची संख्या कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या पुलाचे काम आता पूर्ण झाले असून नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात या पुलाचे लोकार्पण करून हा पुल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.


या पुलामुळे फाटकातून रेल्वे रूळांवरून होणारी वाहनांची ये - जा थेट थांबणार आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण घटणार असून येथे होणारी कोंडी सुटणार आहे. रेल्वेसेवा निरंतर सुरू राहण्यास या पुलामुळे मदत होणार आहे. २०१६ पासून या कामाला गती मिळाली असून विविध विभाग यात सहभागी होते. या पुलामुळे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरची वाहतूक शक्य होणार आहे. लोकल आणि एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्याने लोकलचा प्रवास वेगवान होण्यास मदत होणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. ठाणे आणि कल्याण दरम्यान त्यामुळे शटल सेवा सुरू करण्यास मदत होणार आहे. रेल्वे रूळांवरची मानवी हस्तक्षेपाचे मार्ग बंद झाल्याने त्याचा फायदा रेल्वे प्रवासाला होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Cabinet Meeting : राज्याच्या विकासाला गती; FDI साठी विशेष अधिकारी पद, जात प्रमाणपत्र, रेल्वे निधी... कॅबिनेटचे ७ मोठे धमाके!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२८ ऑक्टोबर) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केईएम रुग्णालयाला दिले व्हेंटिलेटर दान!

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या