जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या

पेण :पेण तालुक्यातील हनुमानपाडा येथील सख्ख्या भावानेच आपल्या सख्ख्या भावाची जमिनीच्या वादातून घराच्या अंगणात हत्या केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात राम हरिभाऊ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. फरार खुनी भावाला दादर सागरी पोलिसांनी काही तासातच पनवेल येथून अटक केली.



सविस्तर घटना अशी की, फिर्यादी संतोष राम पाटील (वय ४०, रा. हनुमानपाडा) यांचे वडील राम हरिभाऊ पाटील व काका पांडुरंग हरिभाऊ पाटील (रा. हनुमानपाडा) यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वडिलोपार्जित जमिनीच्या गुरांच्या वाड्याच्या वाटपावरून वाद चालू होता. रविवार २६ डिसेंबर रोजी परेश पांडुरंग पाटील व राम हरिभाऊ पाटील यांची पत्नी प्रभावती व मुलगा संतोष यांच्यामध्ये घरासमोर वाद झाला. सदर वाद मिटल्यानंतर संतोष पाटील व त्याची आई प्रभावती पाटील हे दोघे त्याबाबत तक्रार देण्यास दादर सागरी पोलीस ठाण्यात आले असल्याचे पाहून पांडुरंग हरीभाऊ पाटील, परेश पांडुरंग पाटील व शैला पांडुरंग पाटील (सर्व राहणार हनुमानपाडा, ता. पेण) हे फिर्यादी संतोष राम पाटील यांच्या घराच्या अंगणात जाऊन त्यांनी राम पाटील यांना शिवीगाळ करून पांडुरंग हरीभाऊ पाटील याने त्याच्याजवळ असणारी बारा बोर बंदुकीतून राम पाटील यांच्या छाती व पोटाच्या खाली गोळ्या झाडल्या. त्यात राम हरिभाऊ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.



सदर गुन्ह्यातील फरार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथक तयार करून यातील महिला आरोपी शैला पांडुरंग पाटील हिला ताब्यात घेऊन तिची सखोल चौकशी केली असता तिने फरार आरोपी पती व मुलगा हे पनवेल येथे गेले असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे तिच्या माहितीवरून सदर पथक पनवेल येथे जाऊन शिताफीने पांडुरंग पाटील व परेश पाटील यांना काही तासातच ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. दादर सागरी पोलीस ठाण्यात भा. दं.वि. कलम ३०२/३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५/२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



पेण :पेण तालुक्यातील हनुमानपाडा येथील सख्ख्या भावानेच आपल्या सख्ख्या भावाची जमिनीच्या वादातून घराच्या अंगणात हत्या केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात राम हरिभाऊ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. फरार खुनी भावाला दादर सागरी पोलिसांनी काही तासातच पनवेल येथून अटक केली.



सविस्तर घटना अशी की, फिर्यादी संतोष राम पाटील (वय ४०, रा. हनुमानपाडा) यांचे वडील राम हरिभाऊ पाटील व काका पांडुरंग हरिभाऊ पाटील (रा. हनुमानपाडा) यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वडिलोपार्जित जमिनीच्या गुरांच्या वाड्याच्या वाटपावरून वाद चालू होता. रविवार २६ डिसेंबर रोजी परेश पांडुरंग पाटील व राम हरिभाऊ पाटील यांची पत्नी प्रभावती व मुलगा संतोष यांच्यामध्ये घरासमोर वाद झाला. सदर वाद मिटल्यानंतर संतोष पाटील व त्याची आई प्रभावती पाटील हे दोघे त्याबाबत तक्रार देण्यास दादर सागरी पोलीस ठाण्यात आले असल्याचे पाहून पांडुरंग हरीभाऊ पाटील, परेश पांडुरंग पाटील व शैला पांडुरंग पाटील (सर्व राहणार हनुमानपाडा, ता. पेण) हे फिर्यादी संतोष राम पाटील यांच्या घराच्या अंगणात जाऊन त्यांनी राम पाटील यांना शिवीगाळ करून पांडुरंग हरीभाऊ पाटील याने त्याच्याजवळ असणारी बारा बोर बंदुकीतून राम पाटील यांच्या छाती व पोटाच्या खाली गोळ्या झाडल्या. त्यात राम हरिभाऊ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.



सदर गुन्ह्यातील फरार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथक तयार करून यातील महिला आरोपी शैला पांडुरंग पाटील हिला ताब्यात घेऊन तिची सखोल चौकशी केली असता तिने फरार आरोपी पती व मुलगा हे पनवेल येथे गेले असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे तिच्या माहितीवरून सदर पथक पनवेल येथे जाऊन शिताफीने पांडुरंग पाटील व परेश पाटील यांना काही तासातच ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. दादर सागरी पोलीस ठाण्यात भा. दं.वि. कलम ३०२/३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५/२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन