साथीच्या आजारांचा धोका वाढला!

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचा धोका असतानाच कावीळ, मलेरिया, चिकनगुनिया या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. २६ दिवसांत साथीच्या आजारांमध्ये दुप्पट वाढ झाल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.


दरम्यान पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढल्यामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. पावसाळ्यानंतरही हे आजार वाढत असल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.



१ ते २६ डिसेंबरपर्यंत मलेरियाचे २३५, गॅस्ट्रोचे ३४९, डेंग्यूचे ३७, कावीळचे ३०, चिकनगुनियाचे १०, लेप्टोचे ४ रुग्ण आढळले आहेत. तर एच १ एन १ रुग्ण आटोक्यात असून गेल्या १९ दिवसांत एकही स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळलेला नाही. तर वर्षभरात लेप्टोमुळे ४ तर डेंग्यूची लागण होऊन ३ जण दगावल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.



एकीकडे कोरोना आणि उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनला रोखण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे तर दुसरीकडे साथीचे आजार रोखण्याचे आव्हान पालिकेसोर आहे. त्यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.




१ ते २६ डिसेंबरपर्यंतचे रुग्ण


मलेरिया - २३५
गॅस्ट्रो - ३४९
डेंग्यू - ३७
कावीळ - ३०
चिकनगुनिया - १०
लेप्टो - ४

Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता