साथीच्या आजारांचा धोका वाढला!

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचा धोका असतानाच कावीळ, मलेरिया, चिकनगुनिया या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. २६ दिवसांत साथीच्या आजारांमध्ये दुप्पट वाढ झाल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.


दरम्यान पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढल्यामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. पावसाळ्यानंतरही हे आजार वाढत असल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.



१ ते २६ डिसेंबरपर्यंत मलेरियाचे २३५, गॅस्ट्रोचे ३४९, डेंग्यूचे ३७, कावीळचे ३०, चिकनगुनियाचे १०, लेप्टोचे ४ रुग्ण आढळले आहेत. तर एच १ एन १ रुग्ण आटोक्यात असून गेल्या १९ दिवसांत एकही स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळलेला नाही. तर वर्षभरात लेप्टोमुळे ४ तर डेंग्यूची लागण होऊन ३ जण दगावल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.



एकीकडे कोरोना आणि उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनला रोखण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे तर दुसरीकडे साथीचे आजार रोखण्याचे आव्हान पालिकेसोर आहे. त्यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.




१ ते २६ डिसेंबरपर्यंतचे रुग्ण


मलेरिया - २३५
गॅस्ट्रो - ३४९
डेंग्यू - ३७
कावीळ - ३०
चिकनगुनिया - १०
लेप्टो - ४

Comments
Add Comment

Sunny Deol Angry On Paparazzi : 'तुम्हाला लाज वाटत नाही का?' धर्मेंद्र यांच्या दुःखात व्हिडिओ बनवणाऱ्या पॅपाराझींवर सनी देओल भडकला; आधी हात जोडले, मग चांगलेच झापले!

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती सध्या नाजुक असून, त्यांच्या

Girija Oak Godbole : निळ्या साडीतील गिरिजा ओक बनली 'नॅशनल क्रश'! सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही एक्स (X),

एटीएसची इब्राहिम अबिदी याच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड

नवी दिल्ली  : पुण्यातील अल कायदा प्रकरणाचे धागेदोरे आता मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे एटीएसने सॉफ्टवेअर

उद्या आणि परवा मुंबईत पाणीबाणी!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची १२०० मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, १२०० मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि ८००

महाराष्ट्रात केवळ मोजक्या पक्षांकडे राखीव निवडणूक चिन्ह

राष्ट्रीय, राज्यस्तरीय वगळता छोट्या पक्षांची होणार दमछाक मुंबई  : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

माहिममध्ये उबाठाकडे मनसेची खुल्या प्रभागांची मागणी, पाच पैंकी तीन खुले प्रभाग आपल्याकडे घेण्याचा मनसेचा विचार

मुंबई (सचिन धानजी):  मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतर आता