साथीच्या आजारांचा धोका वाढला!

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचा धोका असतानाच कावीळ, मलेरिया, चिकनगुनिया या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. २६ दिवसांत साथीच्या आजारांमध्ये दुप्पट वाढ झाल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.


दरम्यान पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढल्यामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. पावसाळ्यानंतरही हे आजार वाढत असल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.



१ ते २६ डिसेंबरपर्यंत मलेरियाचे २३५, गॅस्ट्रोचे ३४९, डेंग्यूचे ३७, कावीळचे ३०, चिकनगुनियाचे १०, लेप्टोचे ४ रुग्ण आढळले आहेत. तर एच १ एन १ रुग्ण आटोक्यात असून गेल्या १९ दिवसांत एकही स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळलेला नाही. तर वर्षभरात लेप्टोमुळे ४ तर डेंग्यूची लागण होऊन ३ जण दगावल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.



एकीकडे कोरोना आणि उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनला रोखण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे तर दुसरीकडे साथीचे आजार रोखण्याचे आव्हान पालिकेसोर आहे. त्यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.




१ ते २६ डिसेंबरपर्यंतचे रुग्ण


मलेरिया - २३५
गॅस्ट्रो - ३४९
डेंग्यू - ३७
कावीळ - ३०
चिकनगुनिया - १०
लेप्टो - ४

Comments
Add Comment

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन

कृत्रिम फुले आणि खेळण्यांच्या रंगांमुळे कर्करोगाचा धोका; विक्रम पाचपुते यांचा इशारा

मुंबई: विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी एक गंभीर

Holi Special ST Buses : होळीसाठी धावणार एसटीच्या १९३ बस; महामंडळातर्फे विशेष सेवा जारी

मुंबई : राज्यभरात होळीच्या सणाची तयारी सुरु झालीये. देवांच्या पालख्या घरोघरी येऊ लागल्या आहेत, त्यामुळे

प्रकल्प स्मार्ट अंतर्गत मुंबई - अहमदाबाद उच्चगती रेल्वे स्थानक क्षेत्र विकासाला एमएमआरडीएची गती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे

मराठीला रोजगार आणि जागतिक ओळखीची भाषा बनवणार - मराठी संवर्धनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : मराठी ही केवळ संस्कृतीची नव्हे तर अर्थकारण आणि रोजगाराचीही भाषा व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे

Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट, काय म्हणाले?

मुंबई: आज 'मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट लिहित मराठीजनांना,