खेड रेल्वे स्टेशनसमोर गांजाची विक्री करणाऱ्या दोघांसह मुद्देमाल जप्त

  92

रत्नागिरी : खेड रेल्वे स्थानकाजवळ एक किलो वजनाच्या २५ हजार ४२५ रुपये किमतीच्या गांजासह दोघांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील प्रशांत प्रभाकर बोरकर वय ६५) यांनी खेड येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, निरंकार राजेंद्र शिंदे ऊर्फ नदीम समीर जसनाईक (वय २१, रा.जलाल शेख मोहल्ला, भोस्ते, खेड) व तौसिफ इक्बाल चौगुले (वय २१, रा. भोस्ते, खेड) हे दुचाकी (एमएच ०८ ए ए एल ०९२५) वरूनखेड रेल्वे स्थानक परिसरात गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती.



त्यानुसार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचला. त्यामध्ये रात्री ८.२० वाजता दोघांना ताब्यात घेण्यात आले. यात एक किलो गांजा सापडला. पोलिसांनी दुचाकीसह सॅमसंग कंपनीचा मोबाईल व २ हजार ८४० रुपये रोकड असा एकूण १ लाख ८ हजार ६२५ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. गांजा विक्री केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या