खेड रेल्वे स्टेशनसमोर गांजाची विक्री करणाऱ्या दोघांसह मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : खेड रेल्वे स्थानकाजवळ एक किलो वजनाच्या २५ हजार ४२५ रुपये किमतीच्या गांजासह दोघांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील प्रशांत प्रभाकर बोरकर वय ६५) यांनी खेड येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, निरंकार राजेंद्र शिंदे ऊर्फ नदीम समीर जसनाईक (वय २१, रा.जलाल शेख मोहल्ला, भोस्ते, खेड) व तौसिफ इक्बाल चौगुले (वय २१, रा. भोस्ते, खेड) हे दुचाकी (एमएच ०८ ए ए एल ०९२५) वरूनखेड रेल्वे स्थानक परिसरात गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती.



त्यानुसार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचला. त्यामध्ये रात्री ८.२० वाजता दोघांना ताब्यात घेण्यात आले. यात एक किलो गांजा सापडला. पोलिसांनी दुचाकीसह सॅमसंग कंपनीचा मोबाईल व २ हजार ८४० रुपये रोकड असा एकूण १ लाख ८ हजार ६२५ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. गांजा विक्री केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत