जम्मू-काश्मिरातील चकमकीत दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मिरात आज, शुक्रवारी पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. अरवानी परिसरात झालेल्या या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. परंतु, सुरक्षा दलांनी या परिसरात शोध मोहिम हाती घेतली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली.


यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अरवानी भागातील मुमनहाल गावात दहशतवादी असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या गावाला वेढा घालून शोध मोहिम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या कारवाईत एक दहशतवादी ठार झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.


काश्मीर खोऱ्यात बुधवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या दहशतवादी घटनांमध्ये एक नागरिक आणि एक पोलिस ठार झाले होते. एकीकडे, श्रीनगरमधील नवाकडलमध्ये दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली, तर दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागात झालेल्या हल्ल्यात एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला.


दहशतवाद्यांनी बुधवारी संध्याकाळी ६ वाजता श्रीनगरच्या नवाकडल भागात रौफ अहमद नावाच्या व्यक्तीला त्याच्या घराजवळ गोळ्या घातल्या, ज्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला येथील एसएमएचएस रुग्णालयात आणले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वेळातच दहशतवाद्यांनी बिजबेहारा रुग्णालयाबाहेर पोलीस एएसआय मोहम्मद अश्रफ यांच्यावर गोळी झाडली, ज्यात ते जखमी झाले. त्यांना श्रीनगरमधील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने