माळशेज घाटात भरधाव वाहनांवर स्पीडगनची नजर...!

बाळासाहेब भालेराव


मुरबाड : माळशेज घाटातून सुसाट वेगात जाणाऱ्या वाहनांवर आता महामार्ग पोलिसांच्या स्पीडगनची कडक नजर असून अनियंत्रित वाहन मालकांच्या मोबाईलवर तत्काळ दंडाची पावती पाठवली जात आहे.

माळशेज घाटात अपघातांचे सत्र नेहमीच सुरू असते. घाटातील अपघात प्रवण क्षेत्रात वाहनचालकांच्या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. अपघातस्थळी देवदूतासारखे माळशेज महामार्ग पोलीस कार्यतत्पर असतात. माळशेज महामार्ग पोलीस नेहमीच रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करून वाहन चालकांना रस्ते नियम व सुरक्षितता या विषयी मार्गदर्शन करून जनजागृती करीत आहेत.

माळशेज घाटातील रस्त्यावर वेग मर्यादा ३० च्या वेगात वाहने चालवणे अपेक्षित आहे. मात्र, काही वाहनचालक या नियमाला पायदळी तुडवीत अनियंत्रित वेगात भरधाव वाहने चालवीत असतात, मात्र आता माळशेज महामार्ग पोलिसांच्या वेग मोजण्याच्या स्पीडगन वाहनामुळे सुसाट वेगाला ब्रेक आला आहे.

वाहतूक व रस्ते नियमांचे काटेकोर पालन वाहनचालकांनी करावे, सुरक्षितता बाळगून प्रवास करावा, असे आवाहन स्पीडगनच्या सहाय्याने वेग मोजण्याचे कर्तव्य बजावणारे माळशेज महामार्ग पोलीस कर्मचारी प्रवीण सर्जेराव गायकवाड यांनी माळशेज घाटात कर्तव्यदक्ष भूमिका बजावत असताना दैनिक प्रहारशी बोलताना सांगितले.
Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.