विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

  117

मुंबई : राज्यातील बहुप्रतिक्षीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर केला आहे. त्यानुसार २७ डिसेंबरला या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येतील. त्यानंतर २८ डिसेंबरला निवडणुकीसाठीचे मतदान पार पडेल.


या निवडणुकीत भाजपकडूनही आपला उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीला महाविकासआघाडी आणि भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.


यावेळी विरोधकांकडून हिवाळी अधिवेशनाचा कालावधी आठवडाभराने वाढवण्याची मागणी करण्यात आली. मात्र, राज्य सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नियोजित वेळापत्रकाप्रमाणे २८ डिसेंबरला संपेल. याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल.


अनेक प्रश्नांवर राज्य सरकारने अद्याप उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, असे विरोधकांचे म्हणणे होते. इतक्या कमी कालावधीत जनतेच्या समस्या कशा मांडणार, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.