धक्कादायक! तामिळनाडूत आढळले ३३ ओमायक्रॉनबाधित तर पश्चिम बंगालमध्ये एका शाळेत सापडले १९ नवीन कोरोनारुग्ण


चेन्नई : ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असताना आता तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तामिळनाडूत ओमायक्रॉनचे (Omicron) एकाचवेळी ३३ रुग्ण आढळून आले आहेत. तर पश्चिम बंगालमधील शाळेत कोरोनाचा (Corona) स्फोट झाला आहे. एका शाळेतील २९ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.


तामिळनाडूमध्ये ओमायक्रॉनचे ३३ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री एम. सुब्रमण्यम यांनी याबाबत माहिती दिली. राज्यात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णाची संख्या ३४ झाली आहे. यापूर्वी केंद्राने सकाळी जाहीर केलेल्या यादीत तामिळनाडूत फक्त १ रुग्ण असल्याचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर देशातील ओमायक्रॉनचा वाढता धोका आणि कोरोनाच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात आढावा बैठक घेणार आहेत.


एकीकडे तामिळनाडून ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असताना दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील एका शाळेतील २९ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील ९ वी आणि १० वी च्या एकूण २९ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांना सर्दी आणि कफ आहे. त्यांच्या पालकांना याची माहिती दिली गेली आहे. विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्याचं आवाहन पालकांना करण्यात आलं आहे, अशी माहिती शाळेच्या प्राचार्य मौसमी नाग यांनी केलं आहे.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी