आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बंगळुरूतून अटक

मुंबई : शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूतला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने त्याला बंगळुरूमधून ताब्यात घेतले आहे. जयसिंग राजपूत हा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा फॅन असल्याचे सांगत आहे.


बंगळुरूहून अटक करण्यात आलेला आरोपी जयसिंग राजपूत (वय ३४) याने ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवला होता. त्या संदेशात त्याने 'सुशांत सिंह राजपूतला तु मारलं, आता नंबर तुझा' अशा आशयाचा संदेश राजपूतने आदित्य ठाकरे यांना केला होता. त्या संदेशाला ठाकरे यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर राजपूतने तीन फोनही केले. आदित्य ठाकरेंनी ते फोन उचलले होते. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसा संदेश त्याने आदित्य ठाकरेंना पाठवला होता. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीने ठाकरेंना अश्लील शब्दात शिवीगाळ देखील केली होती.


या प्रकरणी ठाकरे यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला. त्यावेळी आरोपी जयसिंग बंगळुरू येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी त्याला अटक केली.

Comments
Add Comment

मुंबईतील प्रतिजेजुरी पाहिलीत का? मुंबईतही आहे खंडोबाचे पवित्र देवस्थान

मुंबई : चंपाषष्ठीचा शिवशंकराच्या अवतार मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाचा उत्सव राज्यभर मोठ्या भक्तिभावात

शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण; २०२७ मध्ये होणार ६ मिनिटांचा अंधार

मुंबई : येणाऱ्या वर्षात म्हणेजच २ ऑगस्ट २०२७ रोजी शतकातील सर्वात मोठं आणि दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण पाहायला

मालाड आणि गोरेगावमधील दोन मनोरंजन मैदानांचा होणार विकास

गोरेगाव पहाडीतील मोकळ्या जागेवर उभारले जाणार मनोरंजन मैदान सरदार वल्लभभाई मनोरंजन मैदानाचे होणार

प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

हरकती आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदवता येणार मागील सात दिवसांत २१६७ हरकती, सूचना नोंदवल्या मुंबई (विशेष

शक्ती वाघाचा मृत्यू न्युमोनियामुळे, शव विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर

आता राणीबागेत जय आणि करिष्मा वाघाला पाहता येणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व)

अतिवृष्टीचे संकट, पण सरकारचा आधार; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती

मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली