कंगना राणावत खार पोलीस ठाण्यात; दीड तास नोंदवला जबाब

मुंबई :दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका केल्यासंदर्भात संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी अभिनेत्री कंगना राणावतने खार पोलीस ठाण्यात गुरुवारी हजेरी लावली. दीड तास तिचा जबाब नोंदवण्यात आला.



काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करताना आंदोलनाचा संबंध एका फुटीरतावादी संघटनेशी असल्याचे सांगितले. त्यानंतर शीख संघटनांनी मागील महिन्यात खार पोलीस ठाण्यात कंगना विरोधात तक्रार दाखल केली होती.



दिल्लीच्या सीमेवर झालेले शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन आहे, असं कंगनाने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनात पंजाबमधील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. कंगनाच्या या टिप्पणीनंतर शीख संघटनांकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. कंगनाच्या या टिप्पणीनंतर शीख संघटनांकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.



शीख संघटनेने केलेल्या तक्रारीवर खार पोलिसांनी कंगनाविरोधात एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरविरोधात कंगनाने या हायकोर्टात धाव घेतली होती. पोलिसांनी कंगनाविरोधात २५ जानेवारी २०२२ पर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे म्हटले होते.

Comments
Add Comment

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

एकनाथ शिंदे - गणेश नाईक यांच्यात मनोमिलन?

मंत्रालयात बंद दाराआड चर्चा; नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तिढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५