तुम्ही घेतलेली सीलबंद पाण्याची बाटली ओरीजनल आहे का?

ठाणे : आयएसआय मार्कचा गैरवापर करून सीलबंद पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची (reeha water bottle) मोठ्या प्रमाणावर निर्मिती करुन मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खुलेआम विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS), मुंबई यांनी IS (भारतीय मानक) 14543 नुसार 'सीलबंद पेयजल बाटलीवरील' ISI मार्कचा गैरवापर तपासण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे अंमलबजावणी शोध घेतला आणि जप्तीची कारवाई केली.


मे. अम्मार वॉटर (2298, खोली क्रमांक 3, बस्ती कंपाऊंड, शांतीनगर रोड, नागाव II, भिवंडी-421302, ठाणे) च्या आवारात छापा टाकताना ही संस्था वैध परवान्याशिवाय 'रीहा' ब्रँडसह भिन्न परवाना क्रमांक - CM/L.No-7200168205 वापरून सीलबंद केलेले पेयजल भरून BIS प्रमाणन चिन्हाचा (म्हणजे ISI मार्क) गैरवापर करत असल्याचे आढळून आले. छाप्यादरम्यान IS 14543:2016 नुसार सुमारे 6,408 एक लिटर PET (पॉलीथिलीन टेरेफ्थालेट) बाटल्या आणि अर्ध्या लिटरच्या 8,472 PET बाटल्या जप्त करण्यात आल्या. बीआयएस मुंबईचे अधिकारी निशिकांत सिंग, क श्रेणीचे वैज्ञानिक आणि ब श्रेणीचे वैज्ञानिक विवेकवर्धन रेड्डी, यांनी शोध आणि जप्तीची कारवाई केली.


BIS मानक चिन्हाचा गैरवापर केल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा BIS कायदा 2016 नुसार किमान 2,00,000 रुपये दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. गुन्ह्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली जात आहे.


बनावट आयएसआय चिन्हांकित उत्पादने तयार करून ग्राहकांना मोठ्या नफ्यासाठी विकली जात असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. म्हणून, सर्वांनी बीआयएस संकेतस्थळ http://www.bis.gov.in ला भेट देऊन खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावरील ISI चिन्हाचा खरेपणा तपासण्याची विनंती केली जात आहे.


गैरवापर आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन


नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी कोणत्याही उत्पादनावर ISI मार्कचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास ते प्रमुख, MUBO-II, वेस्टर्न रीजनल ऑफिस, BIS, Manakalaya, E9, मरोळ टेलिफोन एक्सचेंजच्या मागे, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400093 यांना कळवावे. अशा तक्रारी hmubo2@bis.gov.in या पत्त्यावर ई-मेलद्वारे देखील केल्या जाऊ शकतात. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.

Comments
Add Comment

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा

रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्याने सात कंपन्यांची निवड, दोन वर्षांसाठी तब्बल २५७कोटी रुपये करणार खर्च!

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील रस्त्यांखालून तसेच पदपथांखालून विविध सेवा सुविधांचे जाळे पसरले गेलेले असून अनेकदा

महापालिकेच्या केईएम,शीव, नायर रुग्णालयांची भिस्त खासगी सुरक्षेवर, महिन्याला एवढा होतो खर्च...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका सुरक्षा रक्षक खात्यातील रिक्तपदे वाढतच चाललेली असून आजही महापालिकेच्या

जोगेश्वरी येथील व्यावसायिक इमारतीला भीषण आग: २७ जणांची सुटका, ९ जण रुग्णालयात दाखल; जखमींची नावे जाहीर

मुंबई: जोगेश्वरी पश्चिम भागातील गांधी शाळेजवळ असलेल्या जेएमएस बिझनेस सेंटर या इमारतीला आज, गुरुवार, २३ ऑक्टोबर