भारताचा 'पेबल्स' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

मुंबई : पी. एस. विनोथराज यांचा 'पेबल्स' चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ऑस्करच्या पुढील फेरीमध्ये हा चित्रपट प्रवेश मिळवू शकला नाही. त्यामुळे या चित्रपटाला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. इंटरनॅशनल फिचर फिल्म श्रेणीमध्ये आता अंतिम 15 चित्रपटांची नावं घोषित झाली आहेत. बुधवारी अॅकेडमीच्यावतीनं या चित्रपटांची नावं घोषित करण्यात आली होती. पेबल्सच्या निर्मात्यांनी मात्र ऑस्करवर नाराजी व्यक्त केली आहे.



निर्माता विघ्नेश शिवन यांनी व्टिट करुन नाराजी जाहीर केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, आमचा चित्रपट का सिलेक्ट झाला नाही याचा आम्हाला आता विचार करावा लागणार आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे आमची निवड झाली नाही हे जाणून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. मात्र जे यश मिळालं ते देखील कमी नाही. हे आवर्जुन सांगावसं वाटतं. आमची निवड झाली असती तर तो आणखी एक बहुमान ठरला असता असं वाटतं. मात्र ते काही शक्य झालं नाही. त्यामुळे थोडी निराशा वाट्याला आली आहे. अशा शब्दांत निर्मात्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या