भारताचा 'पेबल्स' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

मुंबई : पी. एस. विनोथराज यांचा 'पेबल्स' चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ऑस्करच्या पुढील फेरीमध्ये हा चित्रपट प्रवेश मिळवू शकला नाही. त्यामुळे या चित्रपटाला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. इंटरनॅशनल फिचर फिल्म श्रेणीमध्ये आता अंतिम 15 चित्रपटांची नावं घोषित झाली आहेत. बुधवारी अॅकेडमीच्यावतीनं या चित्रपटांची नावं घोषित करण्यात आली होती. पेबल्सच्या निर्मात्यांनी मात्र ऑस्करवर नाराजी व्यक्त केली आहे.



निर्माता विघ्नेश शिवन यांनी व्टिट करुन नाराजी जाहीर केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, आमचा चित्रपट का सिलेक्ट झाला नाही याचा आम्हाला आता विचार करावा लागणार आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे आमची निवड झाली नाही हे जाणून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. मात्र जे यश मिळालं ते देखील कमी नाही. हे आवर्जुन सांगावसं वाटतं. आमची निवड झाली असती तर तो आणखी एक बहुमान ठरला असता असं वाटतं. मात्र ते काही शक्य झालं नाही. त्यामुळे थोडी निराशा वाट्याला आली आहे. अशा शब्दांत निर्मात्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Comments
Add Comment

आता गुपचूप लग्न शक्य नाही? गुजरातमध्ये विवाह नोंदणीसाठी नवा प्रस्ताव

अहमदाबाद : गुजरातमध्ये विवाहाच्या नोंदणीत काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार, विवाहाची नोंदणी

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे

Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन

AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १०

Patna High Court: बिहार विधानसभा अध्यक्षांसह ४२ आमदारांना हायकोर्टाची नोटीस

- निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप बिहारच्या राजकारणात एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली