भारताचा 'पेबल्स' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

  124

मुंबई : पी. एस. विनोथराज यांचा 'पेबल्स' चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ऑस्करच्या पुढील फेरीमध्ये हा चित्रपट प्रवेश मिळवू शकला नाही. त्यामुळे या चित्रपटाला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. इंटरनॅशनल फिचर फिल्म श्रेणीमध्ये आता अंतिम 15 चित्रपटांची नावं घोषित झाली आहेत. बुधवारी अॅकेडमीच्यावतीनं या चित्रपटांची नावं घोषित करण्यात आली होती. पेबल्सच्या निर्मात्यांनी मात्र ऑस्करवर नाराजी व्यक्त केली आहे.



निर्माता विघ्नेश शिवन यांनी व्टिट करुन नाराजी जाहीर केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, आमचा चित्रपट का सिलेक्ट झाला नाही याचा आम्हाला आता विचार करावा लागणार आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे आमची निवड झाली नाही हे जाणून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. मात्र जे यश मिळालं ते देखील कमी नाही. हे आवर्जुन सांगावसं वाटतं. आमची निवड झाली असती तर तो आणखी एक बहुमान ठरला असता असं वाटतं. मात्र ते काही शक्य झालं नाही. त्यामुळे थोडी निराशा वाट्याला आली आहे. अशा शब्दांत निर्मात्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Comments
Add Comment

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध