मुंबईत गारठा वाढला, पारा आणखी घसरणार का?

मुंबई : मुंबईत आज, गुरुवारी सकाळी थंडीचा जोर वाढल्याने मुंबईकरांना हुडहुडी भरली. दुपारपर्यंत हवेत गारवा होता. मुंबईत या मोसमात पहिल्यांदाच किमान तापमानाने निचांकी गाठली.


फारशा थंड हवेची सवय नसलेल्या मुंबईकरांना पारा १८ अंशांखाली गेला तरी गारव्याची जाणीव होते. मुंबईमध्ये सध्या गारठा आहे. गेल्या आठवड्यात १९ ते २० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान होते.


त्यानंतर सोमवारपासून पारा आणखी खाली घसरू लागला. सांताक्रूझमध्ये नोंद झाल्यानुसार, गेले दोन दिवस १८.६ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. तर गुरुवारी सकाळी पारा १८ अंशांच्या खाली उतरला. यंदाच्या ऋतुमधील हे मुंबईतील सर्वात कमी तापमान आहे.


'ऑक्टोबर हिट'ने हुलकावणी दिली, मात्र ती कसर नोव्हेंबरमध्ये भरून काढली. नोव्हेंबरमध्ये किमान तापमानाचा पारा २५ अंशांपलीकडेही काही वेळा गेला होता. डिसेंबरच्या पंधरवड्यातही किमान तापमानाने थंडीची जाणीव करून दिली नाही. पहिल्या १५ दिवसांमध्ये एकच दिवस १८.५ अंश सेल्सिअसपर्यंत मुंबईचे तापमान उतरले आणि धुक्याचा अनुभव घेता आला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा किमान तापमानाने उसळी घेतली होती.


मात्र आता मुंबईमध्ये तापमान उतरून किमान काही काळ गारठ्याचा अनुभव घेता येतो. या आठवड्यामध्ये हा अनुभव मुंबईकरांना घेता आला आहे. पारा घसरल्याने मुंबईत गारठा वाढला आहे. सर्वसाधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये गेल्या १० वर्षांमध्ये १७ अंशांखालीही तापमान गेले आहे.


आत्तापर्यंतचे सर्वात कमी तापमान १०.६ अंश सेल्सिअस होते. ही नोंद सन १९४९ मधील आहे. आता गुरुवारपेक्षा किमान तापमान खाली उतरणार का, यासाठी पुढील आठवड्याची वाट पाहावी लागेल.

Comments
Add Comment

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना

फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यश मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ

राज्यातील अकुशल कामगारांच्या थकीत मजुरीचा प्रश्न सुटला

मनरेगा अंतर्गत १ हजार १६८ कोटींचा निधी मंजूर; होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा श्रमिकांना मोठा दिलासा मुंबई :

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह