चिंतेत भर! देशात ओमायक्रॉनचे २२० रुग्ण

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने भारतात चिंता वाढवली आहे. देशातील १४ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे. एकूण रुग्णसंख्या २२० वर पोहचली असून त्यात सर्वाधिक ६५ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यानंतर दिल्लीत ५४ तर तेलंगणमध्ये २४ रुग्ण आढळले आहेत. यानंतर कर्नाटक (१९), राजस्थान (१८), केरळ (१५) आणि गुजरात (१४) यांचा समावेश आहे. यामधील ७७ रुग्ण उपचारानंतर बरे किंवा स्थलांतरित झाले आहेत.


देशातील एकूण रुग्णांपैकी ६० टक्केंपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्ली या दोन राज्यातील आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या ११ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या ६५ इतकी झाली आहे. तर जम्मू काश्मीरमध्येही ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे.


देशातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना कोव्हिड-१९ आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सूचनांचे पत्र पाठवण्यात आले आहे.


ओमायक्रॉन व्हेरीयंट डेल्टा व्हेरीयंटपेक्षा तीन पट वेगाने पसरत असल्याचा वैज्ञानिकांचा अभ्यास आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा स्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

Comments
Add Comment

मुलगी ऐकत नसेल, तर तिच्या तंगड्या तोडा: प्रज्ञा ठाकूर

भोपाळ : “जर आमच्या मुलीने बिगर हिंदूच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तिचे पाय तोडण्यात कोणतीही कसर सोडणार

प्रभू श्रीरामांच्या नगरीत इतिहासाची पुनरावृत्ती! अयोध्या दीपोत्सवात दोन नवीन 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'

अयोध्या, उत्तर प्रदेश : प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या पुन्हा एकदा आपल्या 'भव्य आणि दिव्य दीपोत्सवा'मुळे जागतिक

केरळच्या ६ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः हवामान विभागाने

"माझी वरपर्यंत ओळख आहे" : अवैध दारूसाठा प्रकरणी व्यापारी अटकेत !

सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये एका बर्थडे पार्टीत पोलिसांनी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या वाहनातून दारूच्या साठ्यासह

बिहारमधून निवडणूक लढवणार ७२ वर्षांचे आजोबा

पाटणा : बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. यंदा बडा खोदाबंदपूर गावात राहणारे राम स्वार्थ प्रसाद हे ७२

पुराचा फटका बसलेल्यांना दिलासा मिळणार, केंद्राकडून आली मोठी मदत

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी २०२५-२६ या वर्षासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र