इसमाच्या बॅगमधील पिस्तुलाची चोरी

  103

नाशिक- भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या इसमाच्या बॅगमधील एक लाख रुपये किमतीची पिस्तूल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना जय भवानी रोड येथे घडली.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रमोदकुमार यादव (रा. लवटेनगर, जय भवानी रोड, नाशिकरोड) हे दि. 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता बिटको हॉस्पिटलच्या शेजारील मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते. भाजीपाला घेऊन यादव हे जय भवानी रोडवरील शकुंतला पेट्रोल पंपाजवळ थांबले. त्यावेळी सैन्यभरतीसाठी आलेल्या काही अनोळखी मुलांनी भरतीसंदर्भात यादव यांच्याकडे विचारपूस केली आणि ते तेथून निघून गेले.


फिर्यादी यादव हे घरी आले असता त्यांनी बॅगमधील भाजीपाला बाहेर काढला. त्यावेळी त्यांना बॅगमध्ये ठेवलेली सुमारे 1 लाख रुपये किमतीची 32 एनपीबी पिस्तूल दिसली नाही. त्यामुळे त्यांची खात्री झाली, की ही पिस्तूल अज्ञात व्यक्तीने त्यांच्या संमतीशिवाय चोरून नेली. या प्रकरणी यादव यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बोरसे करीत आहेत.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला