देशात ओमायक्रॉनचा धोका वाढला

नवी दिल्ली: देशात करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळेच पुन्हा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता असतानाच दिल्ली सरकारने आज मोठे पाऊल उचलत नाताळ सेलिब्रेशन तसेच न्यू ईयर पार्टी व अन्य सर्वच कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबतचा आदेश आज जारी केला आहे. दिल्लीत ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच केंद्र सरकारने सर्वच राज्यांना मंगळवारी पत्र पाठवून सतर्क केलं आहे व आवश्यकतेनुसार निर्बंध लावण्याची सूचना केली आहे.


त्या पार्श्वभूमीवर डीडीएमएने आज एक आदेश जारी करत दिल्लीत गर्दी होईल अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना मनाई केली आहे.
दरम्यान, देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे २१३ रुग्ण आढळले असून त्यात एकट्या दिल्लीत ५७ रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी दिल्लीतील करोना बाधितांचा आकडाही वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत करोनाचे आणखी १२५ रुग्ण आढळले आहेत तर ५८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज दिल्लीत करोनाने एकही रुग्ण दगावला नाही. सध्या दिल्लीत करोनाचे ६२४ सक्रिय रुग्ण आहेत.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.