संजय सानपला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

  129

बीड : म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांनी परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह संजय सानप याला अटक केली आहे. दरम्यान सानपला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


पुण्यात सायबर पोलिसांकडून सानपची चौकशी चालू होती. त्यावेळी त्याचा या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले आहे.


सानप याचे मूळ गाव असलेल्या वडझरी परिसरातील अनेक मुलांना त्याने नोकरीला लावले असल्याची माहिती समोर येत आहे. याआधी आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणी बीड जिल्ह्यात कारवाई झालेली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणासह इतर परीक्षांमधील गैरप्रकारातही असल्याचे समोर येत आहे.



फसवणूक झालेल्यांनी पुढे येण्याचे आवाहन


आरोग्य, म्हाडा आणि आता टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराचा तपास पुणे सायबर पोलीस ठाण्याचे ७० कर्मचारी करत आहेत. यामध्ये २० अधिकारी आहेत. आरोपींनी टीईटीच्या परीक्षेचा पेपर देण्याच्या आमिषाने अनेकांकडून पैसे घेतले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे उपरोक्त तिन्ही परीक्षांसंदर्भात ज्यांची फसवणूक झाली आहे, अशांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या