वेंगुर्लेत नारायण राणे यांच्या हस्ते कवी आरती प्रभू रंगमंचाचे लोकार्पण

सोनू शिंदे


उल्हासनगर :वर्ष २०१७ पासून आजपर्यंत वेंगुर्ले नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक कामे केली. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेंगुर्ले गावाचा अभ्यास करून, बोध घ्यावा व स्थानिक विकासकार्य घडवून आणले पाहिजे असे मत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. ते वेंगुर्ले गावात पत्रकारांशी बोलत होते. आमदार रवींद्र चव्हाण हे वेंगुर्ले नगर परिषद येथील नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह मधील कवी आरती प्रभू रंगमंचाच्या नुकत्याच झालेल्या लोकार्पण सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थितीत होते. या रंगमंचाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले.

या सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत, स्थानिक वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, स्थानिक नगरसेवक प्रशांत आपटे, उल्हासनगरचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी, कपिल अडसूळ तसेच अन्य मान्यवर मंचावर उपस्थितीत होते. रवींद्र चव्हाण म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीचे प्रशासन व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी राजकारण करण्यापेक्षा वेंगुर्ले नगरपरिषदेसारखे विकास कार्य घडवून आणले पाहिजे.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ले नगराध्यक्ष गिरप यांचे कौतुक करत, कोकणी माणसाने आपला एक उद्योग सुरू करावा असा सल्ला दिला.
Comments
Add Comment

मुंबईतील १३ प्रभागांमध्ये समान आरक्षणाची हॅट्रीक, सलग तिसऱ्या निवडणुकीतही आरक्षण राहिले सारखेच

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली. या प्रभाग

महापालिकेचे वादग्रस्त कचरा खासगीकरणाचे कंत्राटाची निविदा अंतिम, कंपन्यांनी सुमारे ३२ ते ३४ टक्के अधिक दराने लावली बोली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

अतिक्रमण तोडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांचा भाग अडथळामुक्त, या रस्त्यावरुन प्रवास करता येणार सुरळीत

मुंबई (खास प्रतिनिधी): उत्तर मुंबईमध्ये पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा गोरेगाव- मुलंड लिंक रोड विकसित

मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराची शासनाकडे सव्वा तीन हजार कोटींची थकबाकी, महापालिकेच्या पाठपुराव्याला अपयश

मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वतीने तब्बल २ लाख ३२ हजार कोटींची विकास कामे हाती घेण्यात आली. ही

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास