वेंगुर्लेत नारायण राणे यांच्या हस्ते कवी आरती प्रभू रंगमंचाचे लोकार्पण

सोनू शिंदे


उल्हासनगर :वर्ष २०१७ पासून आजपर्यंत वेंगुर्ले नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक कामे केली. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेंगुर्ले गावाचा अभ्यास करून, बोध घ्यावा व स्थानिक विकासकार्य घडवून आणले पाहिजे असे मत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. ते वेंगुर्ले गावात पत्रकारांशी बोलत होते. आमदार रवींद्र चव्हाण हे वेंगुर्ले नगर परिषद येथील नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह मधील कवी आरती प्रभू रंगमंचाच्या नुकत्याच झालेल्या लोकार्पण सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थितीत होते. या रंगमंचाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले.

या सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत, स्थानिक वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, स्थानिक नगरसेवक प्रशांत आपटे, उल्हासनगरचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी, कपिल अडसूळ तसेच अन्य मान्यवर मंचावर उपस्थितीत होते. रवींद्र चव्हाण म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीचे प्रशासन व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी राजकारण करण्यापेक्षा वेंगुर्ले नगरपरिषदेसारखे विकास कार्य घडवून आणले पाहिजे.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ले नगराध्यक्ष गिरप यांचे कौतुक करत, कोकणी माणसाने आपला एक उद्योग सुरू करावा असा सल्ला दिला.
Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही