परभणी : मराठवाडा आणि विदर्भात गेल्या काही दिवसांपासून गारठा वाढला आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामात ढगाळ वातावरणामुळे थंडी काहीशी गायब झाली होती. मात्र, मागील चार दिवसापासून तापमानात मोठी घट होत असल्याने गारठा वाढला आहे.
आज परभणीत ९.५ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या थंडीचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. रब्बी पिकांमध्ये प्रामुख्याने हरभरा, गहू आणि तूर या पिकांना या थंडीचा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
तर दुसरीकडे वाढलेल्या थंडीमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या संख्येमध्ये कमालीची घट दिसून येत आहे. अनेक ठिकांनी शेकोट्या पेटलेल्या आहेत. एकूणच या गुलाबी थंडीचा आनंद परभणीकर घेत आहेत.
पुढील काही दिवस असाच गारठा कायम राहण्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे येणारे काही दिवस परभणीकरांना या बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागणार, हे मात्र निश्चित.
विदर्भ हा सर्वाधिक तापमानाचा प्रदेश आहे. नागपूर आणि चंद्रपूरात सर्वाधिक तापमानाची नोंद आहे. उन्हाळ्यात चंद्रपूरचे तापमान सरासरी ४५ डिग्री असते. तर आता ४९ डिग्री तापमानाची नोंद चंद्रपूरात झालेली आहे. सर्वाधिक तापमान झेलणाऱ्या जिल्ह्यातील जनता आता मात्र गुलाबी थंडीने गारठली आहे. मागील काही दिवसांपासून तापमान घसरल्याने थंडीचा जोर वाढला आहे. भरदिवसा शेकोटीचा आसरा नागरिकांना घ्यावा लागत आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…