मराठवाडा-विदर्भ गारठला; तापमानात मोठी घट

परभणी : मराठवाडा आणि विदर्भात गेल्या काही दिवसांपासून गारठा वाढला आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामात ढगाळ वातावरणामुळे थंडी काहीशी गायब झाली होती. मात्र, मागील चार दिवसापासून तापमानात मोठी घट होत असल्याने गारठा वाढला आहे.


आज परभणीत ९.५ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या थंडीचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. रब्बी पिकांमध्ये प्रामुख्याने हरभरा, गहू आणि तूर या पिकांना या थंडीचा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.


तर दुसरीकडे वाढलेल्या थंडीमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या संख्येमध्ये कमालीची घट दिसून येत आहे. अनेक ठिकांनी शेकोट्या पेटलेल्या आहेत. एकूणच या गुलाबी थंडीचा आनंद परभणीकर घेत आहेत.


पुढील काही दिवस असाच गारठा कायम राहण्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे येणारे काही दिवस परभणीकरांना या बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागणार, हे मात्र निश्चित.


विदर्भ हा सर्वाधिक तापमानाचा प्रदेश आहे. नागपूर आणि चंद्रपूरात सर्वाधिक तापमानाची नोंद आहे. उन्हाळ्यात चंद्रपूरचे तापमान सरासरी ४५ डिग्री असते. तर आता ४९ डिग्री तापमानाची नोंद चंद्रपूरात झालेली आहे. सर्वाधिक तापमान झेलणाऱ्या जिल्ह्यातील जनता आता मात्र गुलाबी थंडीने गारठली आहे. मागील काही दिवसांपासून तापमान घसरल्याने थंडीचा जोर वाढला आहे. भरदिवसा शेकोटीचा आसरा नागरिकांना घ्यावा लागत आहे.

Comments
Add Comment

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा