म्हाडा कॉलनीतील रहिवाशांना विद्युत तारांमुळे धोका

विजय मांडे



कर्जत : म्हाडा कॉलनीतील रहिवाशांच्या जीवास धोकादायक ठरत असलेले विद्युत खांब स्थलांतरित केव्हा होणार, असा प्रश्न म्हाडा कॉलनीतील रहिवासी विचारत आहेत. कारण अगदी इमारतीच्या कडेने गेलेल्या विद्युत तारा कधीही एखाद्याच्या जीवास धोका पोहोचवतील, अशा अवस्थेत आहेत.



‘नको देवराया, अंत आता पाहू’ अशी स्थिती सध्या कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या म्हाडा कॉलनीतील रहिवाशांची झाली आहे. कारण, सुमारे दोन वर्षांपूर्वी वीजवितरण कार्यालयाने म्हाडा कॉलनीमध्ये रहिवाशांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता रहिवाशांना अडथळा ठरेल अशाप्रकारे रात्रीच्या वेळेस रस्त्यांच्या मधोमध गटारापासून एक-दोन फुटांच्या अंतरावर विद्युत पोल उभे केले आहेत. याबाबत म्हाडा कॉलनीतील रहिवाशांनी तसेच स्थानिक नगरसेविका स्वामिनी मांजरे यांनी मागील दोन वर्षांपासून वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्रव्यवहार तसेच कित्येकदा फोनवर संपर्क करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही कारवाई केलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.



या कॉलनीतील रस्त्यावर धोकादायक लावलेल्या विद्युत पोलमुळे अनेक वाहनांचे तसेच नागरिकांचे छोटे-मोठे अपघात झाले आहेत. तसेच भविष्यात प्राणहानीदेखील होण्याची दाट शक्यता आहे; परंतु त्याचे गांभीर्य कित्येकदा तक्रारपत्रे देऊनही वीज कंपनीला नाही. तसेच म्हाडा येथील एका धोकादायक वृक्षाच्या फांद्या विद्युत वाहिनीवर पडून दुर्घटना घडण्याचीही शक्यता आहे. याबाबतही महावितरण कार्यालयास कळवण्यात आले आहे. पण त्या धोकादायक वृक्षाच्या फांद्या आजही आहे त्याच स्थितीत आहेत, असाही आरोप स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान संबंधित अभियंत्यांनी तातडीने म्हाडा कॉलनीतील धोकादायक विद्युत पोलचे स्थलांतर करून धोकादायक वृक्षाच्या फांद्या तोडल्या नाहीत आणि भविष्यात एखादी दुर्घटना घडली, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सदर वीज कंपनीची असेल, असे माहिती अधिकार कार्यकर्ता प्रभाकर गंगावणे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,