म्हाडा कॉलनीतील रहिवाशांना विद्युत तारांमुळे धोका

विजय मांडे



कर्जत : म्हाडा कॉलनीतील रहिवाशांच्या जीवास धोकादायक ठरत असलेले विद्युत खांब स्थलांतरित केव्हा होणार, असा प्रश्न म्हाडा कॉलनीतील रहिवासी विचारत आहेत. कारण अगदी इमारतीच्या कडेने गेलेल्या विद्युत तारा कधीही एखाद्याच्या जीवास धोका पोहोचवतील, अशा अवस्थेत आहेत.



‘नको देवराया, अंत आता पाहू’ अशी स्थिती सध्या कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या म्हाडा कॉलनीतील रहिवाशांची झाली आहे. कारण, सुमारे दोन वर्षांपूर्वी वीजवितरण कार्यालयाने म्हाडा कॉलनीमध्ये रहिवाशांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता रहिवाशांना अडथळा ठरेल अशाप्रकारे रात्रीच्या वेळेस रस्त्यांच्या मधोमध गटारापासून एक-दोन फुटांच्या अंतरावर विद्युत पोल उभे केले आहेत. याबाबत म्हाडा कॉलनीतील रहिवाशांनी तसेच स्थानिक नगरसेविका स्वामिनी मांजरे यांनी मागील दोन वर्षांपासून वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्रव्यवहार तसेच कित्येकदा फोनवर संपर्क करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही कारवाई केलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.



या कॉलनीतील रस्त्यावर धोकादायक लावलेल्या विद्युत पोलमुळे अनेक वाहनांचे तसेच नागरिकांचे छोटे-मोठे अपघात झाले आहेत. तसेच भविष्यात प्राणहानीदेखील होण्याची दाट शक्यता आहे; परंतु त्याचे गांभीर्य कित्येकदा तक्रारपत्रे देऊनही वीज कंपनीला नाही. तसेच म्हाडा येथील एका धोकादायक वृक्षाच्या फांद्या विद्युत वाहिनीवर पडून दुर्घटना घडण्याचीही शक्यता आहे. याबाबतही महावितरण कार्यालयास कळवण्यात आले आहे. पण त्या धोकादायक वृक्षाच्या फांद्या आजही आहे त्याच स्थितीत आहेत, असाही आरोप स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान संबंधित अभियंत्यांनी तातडीने म्हाडा कॉलनीतील धोकादायक विद्युत पोलचे स्थलांतर करून धोकादायक वृक्षाच्या फांद्या तोडल्या नाहीत आणि भविष्यात एखादी दुर्घटना घडली, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सदर वीज कंपनीची असेल, असे माहिती अधिकार कार्यकर्ता प्रभाकर गंगावणे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री