म्हाडा कॉलनीतील रहिवाशांना विद्युत तारांमुळे धोका

विजय मांडे



कर्जत : म्हाडा कॉलनीतील रहिवाशांच्या जीवास धोकादायक ठरत असलेले विद्युत खांब स्थलांतरित केव्हा होणार, असा प्रश्न म्हाडा कॉलनीतील रहिवासी विचारत आहेत. कारण अगदी इमारतीच्या कडेने गेलेल्या विद्युत तारा कधीही एखाद्याच्या जीवास धोका पोहोचवतील, अशा अवस्थेत आहेत.



‘नको देवराया, अंत आता पाहू’ अशी स्थिती सध्या कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या म्हाडा कॉलनीतील रहिवाशांची झाली आहे. कारण, सुमारे दोन वर्षांपूर्वी वीजवितरण कार्यालयाने म्हाडा कॉलनीमध्ये रहिवाशांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता रहिवाशांना अडथळा ठरेल अशाप्रकारे रात्रीच्या वेळेस रस्त्यांच्या मधोमध गटारापासून एक-दोन फुटांच्या अंतरावर विद्युत पोल उभे केले आहेत. याबाबत म्हाडा कॉलनीतील रहिवाशांनी तसेच स्थानिक नगरसेविका स्वामिनी मांजरे यांनी मागील दोन वर्षांपासून वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्रव्यवहार तसेच कित्येकदा फोनवर संपर्क करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही कारवाई केलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.



या कॉलनीतील रस्त्यावर धोकादायक लावलेल्या विद्युत पोलमुळे अनेक वाहनांचे तसेच नागरिकांचे छोटे-मोठे अपघात झाले आहेत. तसेच भविष्यात प्राणहानीदेखील होण्याची दाट शक्यता आहे; परंतु त्याचे गांभीर्य कित्येकदा तक्रारपत्रे देऊनही वीज कंपनीला नाही. तसेच म्हाडा येथील एका धोकादायक वृक्षाच्या फांद्या विद्युत वाहिनीवर पडून दुर्घटना घडण्याचीही शक्यता आहे. याबाबतही महावितरण कार्यालयास कळवण्यात आले आहे. पण त्या धोकादायक वृक्षाच्या फांद्या आजही आहे त्याच स्थितीत आहेत, असाही आरोप स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान संबंधित अभियंत्यांनी तातडीने म्हाडा कॉलनीतील धोकादायक विद्युत पोलचे स्थलांतर करून धोकादायक वृक्षाच्या फांद्या तोडल्या नाहीत आणि भविष्यात एखादी दुर्घटना घडली, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सदर वीज कंपनीची असेल, असे माहिती अधिकार कार्यकर्ता प्रभाकर गंगावणे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Girija Oak Godbole : निळ्या साडीतील गिरिजा ओक बनली 'नॅशनल क्रश'! सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही एक्स (X),

एटीएसची इब्राहिम अबिदी याच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड

नवी दिल्ली  : पुण्यातील अल कायदा प्रकरणाचे धागेदोरे आता मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे एटीएसने सॉफ्टवेअर

उद्या आणि परवा मुंबईत पाणीबाणी!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची १२०० मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, १२०० मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि ८००

महाराष्ट्रात केवळ मोजक्या पक्षांकडे राखीव निवडणूक चिन्ह

राष्ट्रीय, राज्यस्तरीय वगळता छोट्या पक्षांची होणार दमछाक मुंबई  : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

माहिममध्ये उबाठाकडे मनसेची खुल्या प्रभागांची मागणी, पाच पैंकी तीन खुले प्रभाग आपल्याकडे घेण्याचा मनसेचा विचार

मुंबई (सचिन धानजी):  मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतर आता

पिसे पांजरापूर येथे ९१० दशलक्ष लिटर प्रतीदिन क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारणार, आता केंद्राची क्षमता होणार १८२० दशलक्ष लिटर

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी धरणातून आलेल्या पाण्यावर भांडुप संकुल आणि