केरळमध्ये दोन दिवसात दोन नेत्यांच्या हत्या

तिरुवनंतपुरम : केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यात रविवारी एका भाजपा नेत्याची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या (SDPI) नेत्याची हत्या करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपा नेत्याची हत्या करण्यात आली. त्यांच्यावरही हल्ला करुन हत्या करण्यात आली होती. एकाच जिल्ह्यात दोन दिवसात दोन नेत्यांची हत्या झाल्याने खळबळ माजली असून तणावपूर्ण स्थिती आहे.


केरळच्या आलाप्पुझा येथे २४ तासात झालेल्या २ राजकीय हत्याकांडानंतर जमावबंदी लावण्यात आलीय. अवघ्या १२ तासात झालेल्या दोन हत्यांमुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. त्यामुळे कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी आलाप्पुझा येथे धारा १४४ लावण्याचे निर्देश देण्यात आले.


यासंदर्भातील माहितीनुसार एसडीपीआयचे कार्यकर्ते शान के. एस. शनिवारी १८ डिसेंबर रोजी रात्री आपल्या स्कूटरवरुन मन्नाचेरी येथील घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोर हे दुचाकीवरुन आले होते. हल्लेखोरांनी धारदार चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. जखमी झालेल्या शान यांना उपचारासाठी एर्नाकुलम येतील जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारा दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.


या हत्येला १२ तास उलटण्यापूर्वी आज, रविवारी सकाळी डाव्या पक्षाच्या लोकांनी भाजप ओबीसी मोर्चाचे नेते रणजीत श्रीनिवास यांची राहत्या घराबाहेर हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, भाजप नेते मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असता ८ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. चाकू हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पनाराई विजयन यांनी अलाप्पुझा येथे दोन राजकीय नेत्यांच्या हत्येप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. सरकार कुणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला