मोकळ्या जागांवरील पार्ट्यांसाठी राज्य सरकारची कठोर निर्बंध

मुंबई : ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध घातले आहेत. मुंबईत (Mumbai) मोकळ्या जागी येथे होणाऱ्या जंगी कार्यक्रमांना केवळ २०० लोकांनाच परवानगी देण्यात आल्याची माहिती आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सांगितली.


बँन्क्वेट हॉल, बंदीस्त जागी क्षमतेच्या ५० टक्के  मर्यादेपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. तर मोकळ्या जागांवर क्षमतेच्या २५ टक्के लोकांनाच परवानगी मिळणार आहे. याचबरोबर घरी होणाऱ्या पार्ट्यांवर देखील पालिकेची नजर असणार आहे. लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे असे आवाहनही आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केले आहे.


 


नियमावलीतील काही ठळक वैशिष्ट्ये


१) बंदीस्त सभागृह, बंदिस्त रेस्टॉरंट, हॉलमध्ये ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. 



२) मोकळ्या जागी २५ टक्के क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.


 

 


३) ३१ डिसेंबर आणि ख्रिसमस निमीत्त होणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवण्याकरता  प्रत्येक वॉर्डमध्ये महापालिकेची ४ पथकं तैनात असतील.




४) नियम मोडणाऱ्या पार्ट्या आढळल्यास संबंधित रेस्टॉरंट मालक, हॉटेल मालक यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.




३१ डिसेंबर आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली आहे.




 






Comments
Add Comment

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आता पोस्ट ऑफिसमध्येही रेल्वे तिकीट मिळणार

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा यासारख्या सणांमध्ये रेल्वे तिकिटे मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी

मुंबई  : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २४०० कोटी रुपयांच्या मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली

मुंबईत जलवाहतुकीत नवी क्रांती! ना लाटांचे धक्के, ना आवाज मुंबईत येतेय भविष्याची ‘कॅन्डेला’ बोट

कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानाने युक्त बोटी लवकरच मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात दाखल होणार आहेत.

दिवाळीच्या तोंडावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, नागरिकांचा प्रवास होणार उशिराने

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, १९ ऑक्टोबर रोजी