मोकळ्या जागांवरील पार्ट्यांसाठी राज्य सरकारची कठोर निर्बंध

मुंबई : ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध घातले आहेत. मुंबईत (Mumbai) मोकळ्या जागी येथे होणाऱ्या जंगी कार्यक्रमांना केवळ २०० लोकांनाच परवानगी देण्यात आल्याची माहिती आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सांगितली.


बँन्क्वेट हॉल, बंदीस्त जागी क्षमतेच्या ५० टक्के  मर्यादेपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. तर मोकळ्या जागांवर क्षमतेच्या २५ टक्के लोकांनाच परवानगी मिळणार आहे. याचबरोबर घरी होणाऱ्या पार्ट्यांवर देखील पालिकेची नजर असणार आहे. लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे असे आवाहनही आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केले आहे.


 


नियमावलीतील काही ठळक वैशिष्ट्ये


१) बंदीस्त सभागृह, बंदिस्त रेस्टॉरंट, हॉलमध्ये ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. 



२) मोकळ्या जागी २५ टक्के क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.


 

 


३) ३१ डिसेंबर आणि ख्रिसमस निमीत्त होणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवण्याकरता  प्रत्येक वॉर्डमध्ये महापालिकेची ४ पथकं तैनात असतील.




४) नियम मोडणाऱ्या पार्ट्या आढळल्यास संबंधित रेस्टॉरंट मालक, हॉटेल मालक यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.




३१ डिसेंबर आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली आहे.




 






Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री