प्राचीन कृषी शास्त्र पुन्हा शिकण्याची गरज: पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्याला आपले प्राचीन कृषी शास्त्र पुन्हा शिकण्याची गरज आहे, एवढेच नाही, तर त्यावर नव्याने संशोधन करून, ते अद्ययावत करून हे प्राचीन ज्ञान, आधुनिक विज्ञानाच्या साच्यात बसवायचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.


नैसर्गिक शेतीविषयक राष्ट्रीय परिषदेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, गुजरातचे राज्यपाल, तसेच उत्तर प्रदेश आणि गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित होते.


दरम्यान, या दिशेने आपल्याला नव्याने संशोधन करावे लागेल, आपल्या प्राचीन ज्ञानाला नव्या स्वरूपात आणावे लागेल, असेही मोदी यावेळी म्हणाले. आपल्याला पारंपरिक पद्धतीने जे शहाणपण मिळाले आहे, त्याविषयी दक्ष राहावे, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.


यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आता देशाच्या स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंतचा २५ वर्षांचा प्रवास, नवी आव्हाने आणि नव्या गरजांच्या अनुकूल शेतीव्यवस्थेत बदल करणारा असावा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले. गेल्या सहा-सात वर्षांत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली असे सांगत, पंतप्रधानांनी बियाणापासून ते मालाचे विपणन करण्यापर्यंतच्या योजनांचा उल्लेख केला. तसेच किसान सन्मान निधीपासून, ते किमान हमी भाव, उत्पादनाच्या दुप्पट निश्चित करण्यापर्यंत त्यांनी भर दिला.


सिंचनाची भक्कम व्यवस्था उभरण्यापासून, ते सर्व दिशांना किसान रेल्वेचे जाळे उभारण्यापर्यंत, अशा सर्व कृषिविषयक सुधारणांचा त्यांनी उल्लेख करत या कार्यक्रमात देशातील सहभागी शेतकऱ्यांचे पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केले.


देशाच्या हरित क्रांतीत रसायने आणि कृत्रिम खतांचा मोठा वाटा होता, यांची दखल घेत पंतप्रधान म्हणाले की, आता आपल्याला या पर्यायी शेतीवरही काम करण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी रासायनिक कीटकनाशकांचे दुष्परिणामही सांगितले.


पिकांचे उरलेले अवशेष शेतात जाळून टाकण्याच्या पद्धतीविषयी बोलताना, शेतात अशी आग लावल्याने, भूमीची सुपीकता नष्ट होते, असे कृषितज्ज्ञांनी वारंवार सांगितले आहे, तरीही या घटना होत राहतात, अशी खंत यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण

जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर

WhatsApp लॉगिन फेल, मेसेज मिळेनात! मेसेजिंग अॅपमध्ये तांत्रिक बिघाडामुळे कामं ठप्प

WhatsApp वेब वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात लॉग-इन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. Downdetector या संकेतस्थळावर या

Yogi Adityanath : सिंगापूर - जापान दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी केले ₹९०,००० कोटींचे सामंजस्य करार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिंगापूर आणि जपानचा चार दिवसांचा दौरा पूर्ण केला. दोन्ही

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान