वैयक्तिक कर्ज घेणे झाले सोपे

मुंबई (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात कर्ज घेणे सोपे झाले आहे. गृहकर्जावरील व्याजदरांनी नीचांकी पातळी गाठली असताना आता वैयक्तिक कर्ज घेणेही स्वस्त झाले आहे. घरे तसेच गाडी घेण्याची लोकांची स्वप्ने पूर्ण होत असताना आणि वैयक्तिक कर्जाच्या माध्यमातून घराची सजावटही आवाक्यात आली आहे. आजघडीला वैयक्तिक कर्ज ८.१५ टक्के व्याजदराने मिळत असून हा वैयक्तिक कर्जावरील व्याजदराचा आजवरचा नीचांकी आकडा आहे. वैयक्तिक कर्ज असुरक्षित असल्यामुळे त्यावर २० ते २५ टक्के दराने व्याज आकारले जात होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून त्यावरील व्याजदरही घटले आहेत. अनेक बँकांनी वैयक्तिक कर्जावरील व्याजदर घटवल्याचे दिसून येत आहे.



सध्या आयडीबीआय बँक सर्वात कमी दराने वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत असून कर्जाच्या कालावधीनुसार व्याजदर ठरत आहेत. आयडीबीआय बँक ८.१५ टक्के दराने वैयक्तिक कर्ज देत असून काही प्रसंगी १४ टक्के दरानेही कर्ज दिले जात आहे. वैयक्तिक कर्ज १२ ते ६० महिन्यांच्या कालावधीसाठी दिले जाते. २५ हजार रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज दिले जाते. स्टेट बँक ऑफ इंडियातल्या वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरांची सुरूवात ९.६ टक्क्कांपासून होते. हे दर कालावधीनुसार १५.६५ टक्क्यांपर्यंत असतात. ही बँक २५ हजार रुपयांपासून २० लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देते. युनियन बँक ५ ते १५ लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत असून त्यांचे व्याजदर ८.९० ते १३ टक्क्यांपर्यंत आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या वैयक्तिक कर्जावरील व्याजाचे दर ८.९० ते १४.४५ टक्क्यांपर्यंत आहेत. इंडियन बँक ९.५ ते १३.६५ टक्के दराने वैयक्तिक कर्ज देते. पंजाब अँड सिंध बँकेचे व्याजदर ९.३५ ते ११.५० टक्के असून बँक ऑफ महाराष्ट्र ९.४५ ते १२.८० टक्के दराने कर्ज देते. बँक ऑफ बडोदा ९.७५ ते १५.६० टक्के दराने कर्ज देते. यासोबतच खाजगी क्षेत्रातल्या बँकाही वैयक्तिक कर्ज देत असून प्रत्येकाने आपापले व्याजदर ठरवले आहेत.



वैयक्तिक कर्ज मिळवण्याचे नियम फारसे जाचक नाहीत. बँकांसोबतच वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. वैयक्तिक कर्ज घेऊन स्मार्टफोनपासून घरगुती उपयोगाच्या वस्तूंपर्यंत अगदी काहीही घेता येते. परदेशवारी किंवा देशांतर्गत प्रवासासाठीही वैयक्तिक कर्ज घेता येते.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव