बिग बॉसमध्ये तीन खास पाहुण्यांसोबत 'Ticket To Finale'चा रंगणार टास्क !

मुंबई  : 'बिग बॉस मराठी' हा रिऍलिटी शो  आता अंतिम टप्प्यात आला आहे.  कालच्या भागामध्ये मीनल 'Ticket To Finale' च्या टास्कमधून बाहेर पडली. आता फिनालेसाठी चुरस रंगणार आहे ती उत्कर्ष, मीरा आणि विशाल....

'तिकीट टू फिनाले'मध्ये पोहचण्यासाठी हे तिघही जीवाचं रान करतील यात शंका नाही. त्यामुळे आता या शोमधली रंगत अधिकच वाढत चालली आहे. इतके दिवस अनेक टास्कमधून स्वत: ला सिध्द करत हे तीघ इथवर येऊन पोहचले आहेत. आता तिकीट टू फिनाले म्हणजे जणू बिग बॉसच्या ट्रॉफीच्या अगदी जवळ जाणं. ही ट्रॉफी हातात घेण्यात आणि या तिस-या सिझनवर विजेता म्हणून आपल्या नावाचं शिक्कामोर्तब करण्यात हे तिघेही उत्सुक आहेत.



या तिघांपैकी कोणत्या सदस्याला मिळणार 'Ticket To Finale' आणि कोण पोहोचणार अंतिम आठवड्यात हे पाहणं औत्सुकतेचं ठरेल.



तसंच  'Ticket To Finale'चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'Ticket To Finale' चे टास्क काही खास पाहुण्यांसोबत रंगणार  आहेत. म्हणजेच घरात जाणार आहेत तीन खास पाहुणे. अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर. झोंबी सिनेमाच्या निमित्ताने हे तिघं बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. आता हे तिघं बिग बॉसच्या घरात जाणार असल्यामुळे प्रेक्षकांना एन्टरटेन्मेंटचा डबल डोस मिळणार हे नक्की. 

Comments
Add Comment

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय