बिग बॉसमध्ये तीन खास पाहुण्यांसोबत 'Ticket To Finale'चा रंगणार टास्क !

  113

मुंबई  : 'बिग बॉस मराठी' हा रिऍलिटी शो  आता अंतिम टप्प्यात आला आहे.  कालच्या भागामध्ये मीनल 'Ticket To Finale' च्या टास्कमधून बाहेर पडली. आता फिनालेसाठी चुरस रंगणार आहे ती उत्कर्ष, मीरा आणि विशाल....

'तिकीट टू फिनाले'मध्ये पोहचण्यासाठी हे तिघही जीवाचं रान करतील यात शंका नाही. त्यामुळे आता या शोमधली रंगत अधिकच वाढत चालली आहे. इतके दिवस अनेक टास्कमधून स्वत: ला सिध्द करत हे तीघ इथवर येऊन पोहचले आहेत. आता तिकीट टू फिनाले म्हणजे जणू बिग बॉसच्या ट्रॉफीच्या अगदी जवळ जाणं. ही ट्रॉफी हातात घेण्यात आणि या तिस-या सिझनवर विजेता म्हणून आपल्या नावाचं शिक्कामोर्तब करण्यात हे तिघेही उत्सुक आहेत.



या तिघांपैकी कोणत्या सदस्याला मिळणार 'Ticket To Finale' आणि कोण पोहोचणार अंतिम आठवड्यात हे पाहणं औत्सुकतेचं ठरेल.



तसंच  'Ticket To Finale'चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'Ticket To Finale' चे टास्क काही खास पाहुण्यांसोबत रंगणार  आहेत. म्हणजेच घरात जाणार आहेत तीन खास पाहुणे. अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर. झोंबी सिनेमाच्या निमित्ताने हे तिघं बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. आता हे तिघं बिग बॉसच्या घरात जाणार असल्यामुळे प्रेक्षकांना एन्टरटेन्मेंटचा डबल डोस मिळणार हे नक्की. 

Comments
Add Comment

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, फोटो झाले व्हायरल

मुंबई: 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

'दशावतार'च्या गूढ पोस्टरने वाढवली उत्सुकता; १२ सप्टेंबरला उलगडणार रहस्य!

मुंबई: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचे

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

बालकलाकार, तांत्रिक पुरस्कारांतही मराठी कलावंतांचा डंका नवी दिल्ली  : चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या

Rani Mukherji Reaction: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जी काय म्हणाली?

३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राणी मुखर्जीने मिळवला पहिला राष्ट्रीय पुरस्कार Rani Mukherji Reaction on First national Award: राणी

'द केरळ स्टोरी'ला राष्ट्रीय पुरस्कार! केरळचे मुख्यमंत्री संतापले

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन