चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; महिनाभरातील चौथी घटना

चंद्रपूर : पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता घडली. यामुळे खळबळ माजली आहे.


मागील महिन्याभरापासूनत पोंभुर्णा तालुक्यात वाघाने चार बळी घेतले आहेत. दरम्यानच्या, काळात वनविभागाने गस्त वाढविली असून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवली होती. मात्र आज पुन्हा वाघाने हल्ला करीत महीलेचा बळी घेतला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेने तालुक्यात दहशत पसरली आहे.


पोंभुर्णा वनपरिक्षेत्रातील वेळवा येथील संध्या विलास बावने (३५) ही महिला पोंभुर्णा नियतक्षेत्रात गेली होती. त्यावेळी अचानक वाघाने हल्ला करीत तिला जागीच ठार केले. ती वेडसर असून अशीच भटकत जंगलात गेल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.


पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत आजही कायम आहे. पोंभुर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कसरगट्टा गावातील शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात मागील महिन्याच्या २४ तारखेला एक महिला ठार झाल्याची घटना घडली होती. मात्र त्या ठिकाणापासून सदर भाग लांब असून हा हल्लेखोर दुसरा वाघ असल्याची पुष्टी सूत्रांनी जोडली.

Comments
Add Comment

Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात

Govind Barge Death : माजी उपसरपंच बर्गे मृत्यू प्रकरणात मोठी बातमी, नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणी वाढल्या; यंदाची दिवाळीही...

बीड : बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच

Chandshaili Ghat Accident : नंदुरबारच्या चांदशैली घाटात भीषण अपघात; भाविकांची पीकअप जीप दरीत कोसळून ६ ठार, १५ हून अधिक गंभीर जखमी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळी एक हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला आहे. भगवान अस्तंबा ऋषी यांच्या

ट्रेनच्या AC कोचमध्ये प्रवाशांसाठी नवी सुविधा, मळक्या ब्लँकेट्सचा त्रास संपला.

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या स्वछता आणि सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेच्या बेडरोलमध्ये

ऐन दिवाळीत पाऊस पडणार! हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: राज्यात सध्या उन्हाचा कडाक आणि ढगाळ वातावरण असे मिश्र हवामान अनुभवयाला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस

राज्यातील १४३ बँकांवरील निर्बंध आरबीआयने हटविले

पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील आर्थिक अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बँकांवर सर्वसमावेशक निर्बंध (ऑल