लोणार सरोवराबाबत चिंतेची बाब; सरोवरात वाढतेय पाण्याची पातळी

बुलढाणा: पर्यटक आणि शास्त्रज्ञांचे आकर्षण केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सरोवरातील पाण्याची पातळी वाढत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. दरम्यान सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी उल्कापाताने निर्माण झालेल्या या खाऱ्या पाण्याच्या सरोवरात कमळजा देवीचे मंदिर आता १५ फूट पाण्यात बुडाले आहे. महत्त्वाचे म्हणजे सरोवरातील कमळजा देवीचे मंदिर, जे कधीच पाण्याखाली गेले नव्हते, आता पूर्णपणे बुडाले आहे.



गेल्या सहा महिन्यांपासून खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होताना दिसत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. यावर संशोधन होणे गरजेचे आहे, असे सरोवर अभ्यासक सचिन कापूरे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी पुरातत्व विभागाकडे पुढाकार घेण्याची मागणी केली आहे. या निर्माण झालेल्या कुतूहलाबाबत पुरातत्व विभागाने पुढाकार घेऊन निष्कर्ष काढावा अशी मागणी निसर्ग प्रेमी श्रीकांत भुसारी यांनी केली आहे. जिल्ह्यातील सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकही या बदलामुळे आश्चर्यचकीत झाले आहेत.




सरोवराच्या पाण्याची पातळी का वाढत आहे, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विश्वप्रसिद्ध असलेल्या या सरोवराच्या अभ्यासासाठी परदेशातून असंख्य पर्यटक आणि वैज्ञानिक येतात. पण खऱ्या पाण्याच्या या सरोवरात मासे का मिळत आहेत, पाण्याची पातळी का आणि कुठून वाढत आहे, हे रहस्य अजूनही गुलदस्त्यात आहे. या संवेदनशील विषयावर सखोल संशोधन करण्याची तीव्र गरज आहे. मात्र, संबंधित पुरातत्व विभागाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे, ही खेदाची बाब आहे.

Comments
Add Comment

Pune Leopard Attack : जुन्नरमध्ये पुन्हा बिबट्याचा थरार! बहिणीसोबत मॉर्निंग वॉकला गेली अन् दबा धरून बसलेल्या बिबट्याची चिमुरडीवर झडप

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर (Pune Junner) तालुक्यात बिबट्या आणि मानवी वस्तीतील संघर्ष काही केल्या थांबण्याचे नाव घेत

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः