अन्नपदार्थ ऑनलाईन घरपोच करणाऱ्या कंपन्यांना परवाने बंधनकारक करा’

मुंबई : मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात ऑनलाईन उपहारगृहातील अन्नपदार्थ घरपोच पोहचविणाऱ्या कंपन्यांना महापालिकेच्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेकडून विविध अटी व शर्तीसापेक्ष परवाने घेणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी केली आहे.



मुंबईत ऑनलाईन मागणीद्वारे उपहारगृहातून थेट घरी अन्नपदार्थ पोहचवण्याची सोय आहे. अशा अन्नपदार्थ पोहचविणाऱ्या कंपन्यांना महानगर पालिकेच्या थेट नियंत्रणात आणावे व यासाठी महानगरपालिकेकडून विविध अटी व शर्तीसापेक्ष परवाने घेणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. ठरावाच्या सुचनेद्वारे ती मांडली आहे.



दरम्यान मुंबईमध्ये ऑनलाईन कंपन्या ऑनलाईनद्वारे नागरिकांना उपाहारगृहांतील अन्नपदार्थ विहित वेळेत घरपोच पुरवितात. मात्र या कंपन्यांवर महानगरपालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही तर या कंपन्यांचे अन्नपदार्थ पोहचवणारे कर्मचारी वेळेत अन्न पोहचविण्याकरता स्वतःच्या व पादचाऱ्यांच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या दुचाकी रस्त्यांवरून भरधाव नेत असतात. मुंबईतील ठिकठिकाणी उपाहारगृहांच्या बाहेर हे कर्मचारी घोळक्याने उभे असतात. शिवाय त्यांच्या दुचाकी रस्त्यांवर कोठेही वेड्यावाकड्या उभ्या करत असल्याचे देखील आढळून येते. मात्र या सगळ्यांमुळे तेथील ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते, असे देखील म्हात्रे यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे

Comments
Add Comment

ठाणे ते बोरिवली प्रवास होणार अवघ्या १५ मिनिटांत; दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम वेगात

मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला वेग; भांडुप जंक्शनवर एका रात्रीत ४५० टन वजनाचा बसवला स्टील स्पॅन

मुंबई : केवळ एका रात्रीत मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अभियंता पथकाने भांडुप ते सोनापूर

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो होणार सहा डब्यांची; प्रवाशांची होणार गर्दीतून सुटका

३२ अतिरिक्त डबे खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू मुंबई : मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता लवकरच गर्दीमुक्त

आमरण उपोषण मागे; जैन मुनींच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारला १५ दिवसांची मुदत

दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी निलेशचंद्र विजय यांचा निर्वाणीचा इशारा; लोढा-नार्वेकरांची

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायिका म्हणून अविस्मरणीय छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या