अन्नपदार्थ ऑनलाईन घरपोच करणाऱ्या कंपन्यांना परवाने बंधनकारक करा’

मुंबई : मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात ऑनलाईन उपहारगृहातील अन्नपदार्थ घरपोच पोहचविणाऱ्या कंपन्यांना महापालिकेच्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेकडून विविध अटी व शर्तीसापेक्ष परवाने घेणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी केली आहे.



मुंबईत ऑनलाईन मागणीद्वारे उपहारगृहातून थेट घरी अन्नपदार्थ पोहचवण्याची सोय आहे. अशा अन्नपदार्थ पोहचविणाऱ्या कंपन्यांना महानगर पालिकेच्या थेट नियंत्रणात आणावे व यासाठी महानगरपालिकेकडून विविध अटी व शर्तीसापेक्ष परवाने घेणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. ठरावाच्या सुचनेद्वारे ती मांडली आहे.



दरम्यान मुंबईमध्ये ऑनलाईन कंपन्या ऑनलाईनद्वारे नागरिकांना उपाहारगृहांतील अन्नपदार्थ विहित वेळेत घरपोच पुरवितात. मात्र या कंपन्यांवर महानगरपालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही तर या कंपन्यांचे अन्नपदार्थ पोहचवणारे कर्मचारी वेळेत अन्न पोहचविण्याकरता स्वतःच्या व पादचाऱ्यांच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या दुचाकी रस्त्यांवरून भरधाव नेत असतात. मुंबईतील ठिकठिकाणी उपाहारगृहांच्या बाहेर हे कर्मचारी घोळक्याने उभे असतात. शिवाय त्यांच्या दुचाकी रस्त्यांवर कोठेही वेड्यावाकड्या उभ्या करत असल्याचे देखील आढळून येते. मात्र या सगळ्यांमुळे तेथील ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते, असे देखील म्हात्रे यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे

Comments
Add Comment

मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' तांत्रिक बिघाडामुळे मुंबईचा पाणीपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

पाणीटंचाईचं संकट! मुंबई, ठाणे आणि भिवंडीच्या काही भागांना फटका, नागरिकांनी पाणी जपून वापरा मुंबई: मुंबईसह

मुंबईतील इमारत बांधकामांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करा, भाजपची मागणी

मुंबई खास प्रतिनिधी : मागील ८ ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी पूर्व येथील पुनर्विकास स्थळावरून विट पडल्याने २२ वर्षीय

जोगेश्वरीत वीट पडून तरुणीच्या मृत्यूप्रकरणी दोन अभियंत्यांना अटक

जोगेश्वरीमध्ये बांधकाम सुरू असेलल्या इमारतीमधून सिमेंटची वीट पडून खालून जाणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता कमी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा

थकीत ४ हजार कोटींची रक्कम द्या!

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून आंदोलन मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित थकीत चार हजार कोटी

Red Soil Storiesच्या शिरीष गवस यांच्या आजारपणाबद्दलचं सत्य आलेय समोर...पत्नीने सांगितले सर्व काही...

मुंबई: प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल रेड सॉईल स्टोरीजच्या शिरीष गवस यांचे काही दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. त्यांना