शीना बोरा जिवंत असल्याचा इंद्राणी मुखर्जीने पत्रातून केला धक्कादायक दावा

  97

मुंबई : देशात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडात (Sheena Bora Case) आईनेच आपल्या मुलीचा निर्घून खून केला होता. या प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळ्या धक्कादायक घटना समोर आल्या असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने (Indrani Mukherjee) वेळोवेळी आपला जबाब बदलला आहे. त्यातच इंद्राणी मुखर्जीने आता शीना बोरा जिवंत असल्याचा धक्कादायक दावा केला असल्यामुळे सगळेच जण चक्रावले आहेत.


२०१२ साली झालेल्या या घटनेत इंद्राणी मुखर्जीने आपली मुलगी शीना बोरा हीचा खून केल्याचं समोर आलं होतं. मात्र आता इंद्राणी मुखर्जीने सीबीआयच्या संचालकांना पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचं म्हटलं आहे. या पत्रात तिने लिहिले आहे की, "काही दिवसांपूर्वीच तुरुंगात भेटलेल्या एका महिलेने आपल्याला सांगितलं की, तिला काश्मीरमध्ये शीना बोरा भेटली होती." त्यामुळे तिने सीबीआयला काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घेण्याचं आवाहन केलं आहे. या पत्राव्यतिरिक्त, शीना बोराने विशेष सीबीआय न्यायालयासमोर एक अर्ज देखील दाखल केला आहे. यावर देखील लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, शीना बोरा हत्याकांडप्रकरणी इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक झाल्यापासून मुंबईतील भायखळा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तिचा जामीन अर्ज गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. इंद्राणी मुखर्जी लवकरच वकील सना खान यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)