भिवंडीत एका रात्रीत चोरट्यांनी फोडली डझनभर दुकाने

भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी परिमंडळ दोनमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री कोनगावातील डझनभर दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.



भिवंडी परिमंडळ दोनमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी, घरफोड्या, चोऱ्यामाऱ्याच्या घटनांत वाढ झाल्याचे पोलीस ठाण्यात केलेल्या नोंदीवरून दिसून येते. त्यातच भिवंडी पोलीस परिमंडळ दोनच्या हद्दीतील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण भिवंडी मार्गावरील कोन नाक्यावर व गावातील दुकानांना चोरट्यांनी लक्ष करीत नुकतेच एका रात्रीत डझनभर दुकाने फोडली. यामध्ये ५ मेडिकल २ स्वीट मार्ट (मिठाईची दुकाने) आणि २ इतर दुकानांचा समावेश आहे. तर तीन दुकानांचे शटर उचकटत असताना आवाज झाल्याने चोरट्यांनी पळ काढला होता.

Comments
Add Comment

राणीबागेत चला बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन पहायला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या

मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभागनिहाय अंतिम आरक्षण

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला),

Rajesh Aggarwal : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव, चार अधिकाऱ्यांची संधी हुकली

मुंबई : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सोमवार १ डिसेंबर २०२५ पासून पदभार स्वीकारणार आहेत.

महाराष्ट्रातील ७५ गावं स्मार्ट होणार; गावात सीसीटीव्ही, वाय-फाय, डिजिटल शिक्षण व्यवस्था उपलब्ध होणार

मुंबई : महाराष्ट्रातील गावांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची गंगा पोहोचावी यासाठी राज्य सरकार अभिनव उपक्रम राबवत

एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत होणार

सूरत : एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत करता येईल. सर्व अडथळे दूर करून हा प्रकल्प लवकर पूर्ण

प्रारुप मतदार यादीवरील हरकती, सुचनांची गांभीर्याने दखल घ्या

महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई