भिवंडीत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यासाठी जनजागृती

भिवंडी (वार्ताहर) : टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या हेतूने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक कर्मचाऱ्यांनी स्वच्छ भारत अभियान २०२१-२२ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत मनपा आरोग्य विभागाचे उपायुक्त दिपक झिंझाड यांच्या मार्गदर्शनाखाली वेताळ पाडा व संभाजी चौक येथे नगरसेवक अरुण राऊत आणि अभिषेक राउत यांच्या उपस्थितीत नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत, तसेच ओला कचरा व भाजीपाल्याचा कचरा, जेवणाचा खरकटा, फळांच्या साली, कागद-प्लास्टिक भंगारवाल्यांना विकण्याबाबत त्याचप्रमाणे सिंगल युस प्लास्टिक बंदी, कापडी पिशवीचा वापर, ओल्या कचऱ्यापासून शहरातील आरीफ गार्डन येथील खत निर्मूलन केंद्रात खत बनवणे अशा प्रकारे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.



यावेळी सहाय्यक आयुक्त दिलीप खाणे, प्रभाग आरोग्य निरीक्षक एम. पी.विशे, आरोग्य निरीक्षक दिपक धनगर, महेश दुसा, दिगंबर जाधव, मुकेश सुर्वे, महेश सोनवणे आदी कर्मचारी उपस्थित होते





Comments
Add Comment

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगवान पोर्शे कार डिव्हायडरला धडकली, ड्रायव्हर गंभीर जखमी

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात