वसईत पहिल्या पत्नीचा लग्नात धिंगाणा

नालासोपारा (वार्ताहर) : पहिले लग्न झालेले असताना दुसरे लग्न करणे एका नवरोबाला चांगलेच महागात पडले आहे. दुसरे लग्न धुमधडाक्यात सुरू असताना पहिल्या पत्नीने लग्नात धुमाकूळ घातला. अचानक घडलेल्या या प्रकाराने विवाहाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना धक्का बसला. या घटनेने नवरदेवही हैराण झाला.



वसईत पार पडत असलेल्या लग्नात हा प्रकार घडला. पत्नीने आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नात राडा केला. ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने पतीचे दुसरे लग्नच उधळून लावले. पतीचे लग्न सुरू असतानाच पहिल्या पत्नीने हॉलमध्ये धाड घालून राडा केला व अंतिम टप्प्यात सुरू असलेले लग्नच मोडून टाकले.



वसई पूर्वेच्या वसंतनगरी परिसरातील जोशी पार्टी हॉलमध्ये हा प्रकार घडला. अर्जुन सिंग असे पतीचे नाव असून, कांचन सिंग असे पत्नीचे नाव आहे. २०१२ मध्ये या दोघांचा वैदिक पद्धतीने विवाह झाला होता. पतीने या विवाहात हुंडाही घेतला होता. मात्र, सहा महिन्यांतच पतीने पत्नीला दूर केले होते.



या दोघांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असतानाच रविवारी पती दुसरे लग्न करत असल्याचे कांचनला समजले आणि तिने मग भर लग्नमंडपात येऊन राडा घातला. पत्नीने दाखवलेल्या या धाडसामुळे नवरदेवाच्या पहिल्या लग्नाचा भांडाफोड झाला व दुसरे लग्न होता होता थांबले. सुमारे दोन तास सुरू असलेल्या या राड्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले. पतीने केलेल्या या कृत्याबाबत त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित पत्नीने केली आहे.





Comments
Add Comment

सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी; दृतगती मार्गासह, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांचा खोळंबा

मुंबई : सलग सुट्ट्यामुळे रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर शनिवारी दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाली

भिवंडीमध्ये मानवतेला काळीमा; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नीवर हुंड्यासाठी ......, पतीसह सात आरोपींवर गुन्हा

भिवंडी : कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार सुरू असताना एका महिलेवर हुंड्याच्या हव्यासापोटी अमानुष छळ

Mumbai Vileparle : मुंबईकरांच्या पार्ले-जीचा सुगंध आता कायमचा हरवणार! ८७ वर्षांचा पार्ले-जीचा कारखाना होणार जमीनदोस्त; नेमकं कारण काय ?

मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले (पूर्व) परिसरातील ज्या कारखान्यामुळे या उपनगराला एक वेगळी ओळख मिळाली, तो पार्ले

77th Republic Day : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, संविधानातील नियमांचा रोजच्या जीवनातील महत्व आणि ताकद जाणून घ्या

मुंबई : २६ जानेवारी हा दिवस भारताच्या लोकशाही प्रवासातील निर्णायक टप्पा मानला जातो. १९५० साली याच दिवशी भारतीय

युनेस्को दर्जाप्राप्त गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम

पर्यटन वाढीमुळे निर्माण झालेल्या कचऱ्यावर आळा मुंबई : युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या

प्रभाकर शिंदे ‘स्थायी’, तर खणकर सभागृह नेता?

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित झाले असून तसे झाल्यास सभागृह