वसईत पहिल्या पत्नीचा लग्नात धिंगाणा

नालासोपारा (वार्ताहर) : पहिले लग्न झालेले असताना दुसरे लग्न करणे एका नवरोबाला चांगलेच महागात पडले आहे. दुसरे लग्न धुमधडाक्यात सुरू असताना पहिल्या पत्नीने लग्नात धुमाकूळ घातला. अचानक घडलेल्या या प्रकाराने विवाहाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना धक्का बसला. या घटनेने नवरदेवही हैराण झाला.



वसईत पार पडत असलेल्या लग्नात हा प्रकार घडला. पत्नीने आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नात राडा केला. ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने पतीचे दुसरे लग्नच उधळून लावले. पतीचे लग्न सुरू असतानाच पहिल्या पत्नीने हॉलमध्ये धाड घालून राडा केला व अंतिम टप्प्यात सुरू असलेले लग्नच मोडून टाकले.



वसई पूर्वेच्या वसंतनगरी परिसरातील जोशी पार्टी हॉलमध्ये हा प्रकार घडला. अर्जुन सिंग असे पतीचे नाव असून, कांचन सिंग असे पत्नीचे नाव आहे. २०१२ मध्ये या दोघांचा वैदिक पद्धतीने विवाह झाला होता. पतीने या विवाहात हुंडाही घेतला होता. मात्र, सहा महिन्यांतच पतीने पत्नीला दूर केले होते.



या दोघांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असतानाच रविवारी पती दुसरे लग्न करत असल्याचे कांचनला समजले आणि तिने मग भर लग्नमंडपात येऊन राडा घातला. पत्नीने दाखवलेल्या या धाडसामुळे नवरदेवाच्या पहिल्या लग्नाचा भांडाफोड झाला व दुसरे लग्न होता होता थांबले. सुमारे दोन तास सुरू असलेल्या या राड्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले. पतीने केलेल्या या कृत्याबाबत त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित पत्नीने केली आहे.





Comments
Add Comment

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे