महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार : डॉ अमोल कोल्हे

  256

मुंबई :  बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतल्याबद्दल खासदार आणि अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी आनंद व्यक्त केला .


फेसबुक द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना डॉ अमोल कोल्हे म्हणाले, "जय शिवराय, अतिशय आनंदाची बातमी सांगतोय, आपल्या महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार....होय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरु करण्यास मंजूरी दिली आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरु व्हावी यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. त्यावर आज मा. न्यायालयाने आज निकाल दिला. बैलगाडा मालक , शौकीन , बैलगाडा प्रेमी यांच्यासह मराठी माती आणि संस्कृतीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या निकालाबद्दल मी तमाम बैलगाडा मालकांचे, शौकिनांचे, प्रेमींचे मनापासून अभिनंदन करतो. यासोबतच महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिलजी केदार व राज्य सरकार यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

बैलगाडा शैर्यतीसंबंधी त्यांची भेट घेतल्यापासून माननीय पशुसंवर्धन मंत्री व महाराष्ट्र सरकारने मोठ्या तडफेने न्यायालयात बाजू मांडली आणि त्यामुळेच आज हा निर्णय आपल्या बाजूने लागला आहे असे मी प्रामाणिकपणे नमूद करतो. वेळोवेळी यासंदर्भात आवाज उठवणारे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, माननीय सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे वकील या सर्वांचेही मनापासून आभार. यासोबतच सर्वसामान्य जनतेने देखील याबद्दल संयम दाखवित शांततेच्या मार्गाने संघर्ष केला. वेळोवेळी या लढ्याला ताकद देण्याचं काम केलं याबद्दल त्यांचेही आभार.

पण आजचा विजय हा अंतिम नाही याचीही जाणीव मी सर्वांना करून देऊ इच्छितो. द्विसदस्यीय खंडपीठाने दिलेला आजचा निर्णय ५ सदस्यीय खंडपीठासमोर अंतिम सुनावणी होईपर्यंत लागू असेल. तामिळनाडू, कर्नाटक या इतर राज्यांसमवेत महाराष्ट्राच्या याचिकेची एकत्रित सुनावणी ही ५ सदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या न्यायालयीन तसेच संसदीय प्रक्रियेची तयारी आपण अव्याहतपणे सुरु ठेवणार आहोत जेणेकरून आजचा मिळालेला तात्पुरता दिलासा आपल्याला कायमस्वरूपी मिळेल. यासाठी दिलेल्या शब्दाप्रमाणे मी कटिबद्ध आहे आणि महाराष्ट्र सरकार देखील याबाबत सकारात्मक आहे. म्हणूनच ही शर्यत देखील आपणच जिंकू याचा विश्वास आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार... ! "

Comments
Add Comment

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री

मुंबईत गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं आंदोलन, पाण्यात उभं राहून घोषणाबाजी

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण कमी करू नये, ही मागणी घेऊन लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत.

Sudhir Mungantiwar : हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन! महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ आमदारांना मराठी नकोशी

विधानसभा अध्यक्षांकडे इंग्रजी कामकाजपत्रिकेची मागणी मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाजाची पत्रिका

Narayan Rane : घरी बोलवा, मिठ्या मारा; एवढा गवगवा का? राणेंचा एकाचवळी दोन्ही ठाकरे बंधूंवर घणाघात; दिशा सालियन बद्धल काय म्हणाले नारायण राणे?

मुंबई : एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं