पंतप्रधानांकडून ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. गेल्या 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान आज, बुधवारी बंगळुरू येथील रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

यासंदर्भात ट्विटरवर शोकसंदेश जारी करताना पंतप्रधान म्हणाले की, ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी अभिमानाने, शौर्याने आणि अत्यंत कार्यकौशल्याने देशाची सेवा केली. त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांचे देशासाठीचे भरीव योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कुटुंबियांप्रति आणि मित्रांप्रति सहवेदना व्यक्त करत असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केलेय.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी