पंतप्रधानांकडून ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांना श्रद्धांजली

  95

नवी दिल्ली : ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. गेल्या 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान आज, बुधवारी बंगळुरू येथील रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

यासंदर्भात ट्विटरवर शोकसंदेश जारी करताना पंतप्रधान म्हणाले की, ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी अभिमानाने, शौर्याने आणि अत्यंत कार्यकौशल्याने देशाची सेवा केली. त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांचे देशासाठीचे भरीव योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कुटुंबियांप्रति आणि मित्रांप्रति सहवेदना व्यक्त करत असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केलेय.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.