मुंबई :यंदा ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनवर महानगरपालिकेची नजर ठेवली जाणार आहे. गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ३१ डिसेंबरला सभागृह, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट फक्त ५० टक्के क्षमतेनेच चालवण्याची अट घातली आहे.
१५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे बहुतांश लोकांना ‘थर्टी फर्स्ट’जोशात साजरा करता आला नव्हता. यंदा कोरोनाच्या निर्बंधांमध्ये थोडी सवलत दिल्याने सेलिब्रेशनचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसनी तयारीला सुरुवात केली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात अनेक ठिकाणी गर्दी होणार हे गृहीत धरुन मुंबई महानगरपालिकेनेही धोरण आखले आहे.
‘थर्टी फर्स्ट’ निमित्त मुंबईत अनेक ठिकाणी मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांवर पालिकेकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक वॉर्डात पालिकेकडून दोन टेहळणी पथके तैनात केली जातील. वॉर्ड मोठा असल्यास आणि गरज पडल्यास चार पथके तैनात केली जातील. ही पथके सर्व ठिकाणी नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवून असतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग ३ साठी केंद्र सरकारद्वारे जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) यांच्या…
सुरत: सुरतच्या सचिन परिसरात शनिवारी बहुमजली इमारत कोसळली. ही इमारत कोसळल्यानंतर एनडीआरएफ, फायर ब्रिगेडचे संघ…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा…
मुंबई: अर्शदीप सिंह टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर राहिला. त्याने…
विशेष - भालचंद्र ठोंबरे नहूष हा कुरूवंशातील पराक्रमी राजा होता. तो ययातीचा पिता आणि आयूचा…
निसर्गवेद - डॉ. महालक्ष्मी वानखेडकर गली खजिन्यातील एक हिरा म्हणजे ही कवक, बुरश्या, भूछत्र, अळंबी,…