ऋतुराजचा तुफान फॉर्म कायम

सौराष्ट्र (वृत्तसंस्था): महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचे काही खरे नाही. ड गटात पाचव्या सामन्यात मंगळवारी चंदिगडविरुद्ध त्याने १६८ धावांची चमकदार खेळी करत संघाला पाच विकेटनी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. पाच सामन्यांत सर्वाधिक ६०३ धावांचा पराक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. चार शतकांमध्ये ५१ चौकार अन् १९ षटकारांचा समावेश आहे.



चंदिगडविरुद्ध ३१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराजने पुन्हा एकदा कर्णधाराला साजेशी खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड व वाय नाहर यांनी पहिल्या विकेटसाठी १०९ धावा जोडल्या. पण, नाहर ३८ धावांवर माघारी परतल्यानंतर महाराष्ट्राची गाडी घसरली. राहुल त्रिपाठी ( ०), अंकित बावणे ( १२), नौशाद शेख ( ०) हे झटपट माघारी परतले. ऋतुराजने १३२ चेंडूंत १२ चौकार व ६ षटकारांसह १६८ धावांची खेळी केली. ए काझीनं नाबाद ७३ धावा करताना महाराष्ट्राला ५ विकेट राखून विजय मिळवून दिला.



प्रथम फलंदाजी करताना मनन वोहराच्या १४१ धावा आणि अर्सलन खान ( ८७) व कौशिकच्या ( ५६) अर्धशतकांच्या जोरावर चंदिगडगने ७ बाद ३०९ धावा केल्या.पी. दाधेने ४९ धावांत ४ विकेट घेतल्या. विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२मध्ये १६८ धावांची खेळी ही ऋतुराजची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. त्याने या स्पर्धेत १५०.७५च्या सरासरीने धावा कुटल्या. त्यानं एकूण ५१ चौकार व १९ षटकारही लगावले.



ऋतुराज गायकवाडनं यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक ६०३ धावांचा पराक्रम केला आहे. त्यानं केवळ पाच सामन्यांत चार शतकांसह ही आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेश ( १३६ धावा), छत्तीसगड (नाबाद १५४), केरळा ( १२४) व चंदिगड (नाबाद १६८) अशी चार शतकं ऋतुराजनं विजय हजारे ट्रॉफीत झळकावली आहेत. विराट कोहली (२००८-०९), पृथ्वी शॉ (२०२०-२१) व देवदत्त पडिक्कलनंतर ( २०२०-२१) एका पर्वात चार शतकं करणारा तो चौथा फलंदाज बनला.

Comments
Add Comment

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.