कोविड काळात मुंबई पालिकेकडून घोटाळा



मुंबई (प्रतिनिधी): कोविड काळात मुंबई महापालिकेकडून कोविड घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोविड काळातील अधिकाराचा वापर करून शिवसेना नेते आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये कोविडचे कंत्राट मिळवण्याची स्पर्धा सुरू होती असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.



सोमय्या म्हणाले की, मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त मनीष वाळुंज यांनी कोविड काळातील १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट आपल्या आणि वडीलांच्या तसेच मित्रांच्या कंपन्यांमध्ये मिळवले आहे. मनीष वाळुंज हे कुर्ला एल वॉर्डचे सहाय्यक आयुक्त होते; सध्या ते भायखळा येथील सहाय्यक आयुक्त आहेत. तर मनीष यांचे वडील राधाकृष्ण वाळुंज यांनी २१ ऑगस्ट २०२० रोजी जेनेहेल्थ डायग्नोस्टिक प्रा. लि. कंपनीची स्थापना केली होती. मात्र या कंपनीला अवघ्या काही दिवसांत ३० कोटींहून अधिक रक्कमेचे टेंडर दिले. यात आरटीपीसीआर, कोविड टेस्टिंग हे काम नवीन सुरू झालेल्या कंपनीला देण्यात आले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.


तर १८ जून २०२१ रोजी जेनेसी डायग्नोस्टिक या कंपनीची स्थापना केली. या कंपनीला देखील मोठमोठे कोविडचे टेंडर देण्यात आले. यात आरटीपीसीआर टेस्ट, अॅन्टीजेन टेस्ट, स्वॅब टेस्ट अशा अनेक ऑर्डर या कंपनीला मिळायला लागल्या. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्या नवीन असून या व्यवसायाचा त्यांना अनुभव नाही किंवा ते वैद्यकीय तज्ज्ञ देखील नाही. अशाच पद्धतीने कोविड काळातील अनेक मोठे कॉन्ट्रॅक्ट पालिका अधिकारी व सत्ताधारी राजकीय नेत्यांचे नातेवाइक मित्रपरिवार यांना मिळाले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.



दरम्यान अशा प्रकारच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टची चौकशी करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली असून मनीष वाळुंज यांच्या संबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही सोमय्या यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि