स्वतंत्र रिक्षा स्टॅण्डचा प्रश्न कधी मार्गी लागणार?

  89

कुणाल म्हात्रे



कल्याण : कल्याणमधील अबोली रिक्षाचालक महिलांनी प्रशासनाकडे स्वतंत्र रिक्षा स्टॅण्डची मागणी केली आहे. कल्याण, डोंबिवली स्टेशन पूर्व पश्चिम परिसरात स्वतंत्र रिक्षा स्टॅण्ड अबोली रिक्षांसाठी उपलब्ध व्हावे, जेणेकरून अबोली रिक्षाने प्रवास करू इच्छुक महिला प्रवाशांना ते सोयीचे होईल. दरम्यान स्वतंत्र रिक्षा स्टॅण्डचा प्रश्न मार्गी कधी लागणार, असा सवाल अबोली रिक्षाचालक महिलांनी केला आहे.
या संदर्भात पाठपुरावा करीत असून प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचे अबोली रिक्षाचालक महिलांचे म्हणणे आहे.



महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीसाठी महाराष्ट्र शासनाने महिलांना २०१७ मध्ये अबोली रिक्षा परवाना देण्यास सुरुवात केली. त्यानुसार कल्याण-डोंबिवली शहरात आजमितीस सुमारे ३० ते ३५ अबोली रिक्षा आहेत. मात्र, महिला रिक्षाचालकांना स्वतःचा रिक्षा स्टॅण्ड मिळालेला नाही. अबोली रिक्षा सुरू करताना मोठा गाजावाजा केला होता. कल्याण-डोंबिवली शहरात शेकडो अबोली रिक्षा फिरताना दिसतील व महिलांना सुरक्षित प्रवास करता येईल, अशा वल्गना शासकीय पातळीवर व लोकप्रतिनिधी यांनी केल्या होत्या. मात्र शासन व अधिकारी यांनी अबोली रिक्षा चालकांना प्रोत्साहन दिले नसल्याने अबोली रिक्षांची संख्या वाढली नाही.



प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस व कल्याण डोंबिवली महापालिकेने कल्याण-डोंबिवली शहरात पूर्व व पश्चिम विभागात अबोली रिक्षाचालकांनी कायमस्वरूपी रिक्षा स्थानक मिळण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे.



कल्याण-डोंबिवलीत अबोली रिक्षा व्यवसाय करताना महिला रिक्षाचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरात प्रवासी घेण्यासाठी रांगेत उभे राहिल्यास एक ते दीड तास वाट पाहत रांगेतील रिक्षा ढकलावी लागते, त्यामुळे थकवा येतो. त्याचप्रमाणे वेळ जास्त लागत असल्यामुळे व्यवसाय हवा तसा होत नाही. रिक्षाचे बँकेचे हफ्ते फेडणे यातून घरखर्चाचा ताळमेळ कसा बसणार? तसेच कोरोना पार्श्वभूमीमुळे बिघडलेल्या अर्थिक घडीतून कसे सावरायचे, असे अनेक प्रश्न भेडसावत असल्याचे, अबोली रिक्षाचालक शारदा ओव्हळ यांनी सांगितले.



अबोली चालविण्यासाठी महिला पुढे येत नाहीत, यामुळे अबोली रिक्षाचालकांसाठी स्टॅण्ड राखीव ठेवल्यास महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल. यासाठी रिक्षा स्टॅण्ड आरक्षित ठेवावा, अशी मागणी अबोली रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष संतोष भगत व कल्याण शहर महिला अध्यक्षा शारदा ओहळ यांनी पालिका प्रशासन, आरटीओ व वाहतूक पोलिसांकडे केली आहे.

Comments
Add Comment

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२,७१,२९५ विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई: राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे

लोकलमधून उडी मारल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

मुंबई : पश्चिम रेल्वेवर असलेल्या मुंबई सेंट्रल स्टेशनवर एका २७ वर्षीय प्रवाशाचा चुकीच्या बाजूला उतरण्याच्या

चर्चगेट स्टेशनवर मोंजिनीस शॉपला आग, प्रवाशांमध्ये खळबळ!

मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकात गुरुवारी सायंकाळी एक भीषण घटना घडली. स्टेशनच्या आत असलेल्या 'मोंजिनीस केक शॉप'

मुंबईत बीकेसीतील सेबी भवनात अजगरांच्या पिलांचा सुळसुळाट

मुंबई : यंदा मान्सूनचे आगमन मे महिन्यातच झाले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. यामुळे जशी

Uddhav Thackeray and Raj Thackeray alliance : ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेच मोठं भाष्य; म्हणाला, "दोन्ही भाऊ एकत्र आले तर..."

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यामध्ये

गोरेगाव गोकुळधाममधील इमारतीत उघड्या जागेवर बकऱ्यांची कुर्बानी

स्थानिक रहिवाशांनी घेतली हरकत मुंबई (खास प्रतिनिधी): बकरी ईद निमित्त बकऱ्यांची कुर्बानी इमारती तथा गृहनिर्माण