श्रीनगर : श्रीनगरच्या रंगरेथ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भागात अजून काही दहशतवादी असल्याची माहिती मिळत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आला आहे.
श्रीनगरच्या रंगरेथमध्ये दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीवरून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलाने कडक घेराव घातल्याचे पाहून दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला.
मात्र संयम दाखवत दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना अनेकवेळा संधीही दिली. तरीसुद्धा दहशदवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवल्यामुळे सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवादी ठार झाले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…