श्रीनगर : श्रीनगरच्या रंगरेथ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भागात अजून काही दहशतवादी असल्याची माहिती मिळत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आला आहे.
श्रीनगरच्या रंगरेथमध्ये दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीवरून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलाने कडक घेराव घातल्याचे पाहून दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला.
मात्र संयम दाखवत दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना अनेकवेळा संधीही दिली. तरीसुद्धा दहशदवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवल्यामुळे सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवादी ठार झाले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…
आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…
परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…
हाथरस : उत्तर प्रदेशचे (Uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील…
मुंबई : दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) परीक्षेत अनुत्तीर्ण (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर…
चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार…