

आयुष्यं हे विधात्याच्या वहीतलं पानं असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. शेवटचं पानं मृत्यू तर पहिलं पानं जन्म असतं. मधली पानं आपणच भरायची असतात. कारण आपलंच ते कर्म असतं.... चुका जरी झाल्या तरी फाडून फेकायचं नसतं. कारण त्यातूनचं आपल्याला पुढे शिकायचं असतं. एकटे आलो म्हणून काय झालं सर्वांच होऊन जायचं असतं...

तृप्तीताईंनी इतकी समर्पक कविता सांगितल्यावर घरातील सदस्यांना अश्रू अनावर झाले.