कोस्टल रोड प्रकल्पबाधित मच्छीमारांच्या भरपाईसाठी टाटा इन्स्टिट्यूटची नियुक्ती होणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी असलेल्या कोस्टल रोडच्या कामात बाधित होणाऱ्या मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठीचे धोरण ठरवण्यासाठी व सर्वेक्षण करण्यासाठी पालिकेकडून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.



The Tata Institute will be appointed to compensate the fishermen affected by the Coastal Road project


मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचे काम २०१८ पासून सुरू आहे. मात्र या प्रकल्पात वरळी भागातील मच्छीमार बाधित होणार असून त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी व सल्लागार नियुक्तीसाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. मात्र निविदेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे निविदांची मुदत वाढवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा निविदा काढल्यानंतर एकाच निविदाकाराने प्रतिसाद दिला होता. त्यामुळे अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे पालिकेने यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेची नियुक्ती करण्याचे ठरवले आहे.



दरम्यान याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात येणार असून यावेळी पुन्हा भाजपकडून विरोध होण्याची शक्यता आहे. आधीच कॅगने दिलेल्या अहवालामुळे कोस्टल रोड कामावर ताशेरे ओढले असल्यामुळे भाजपने कोस्टल रोड कामातील घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता.



टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कडून या कामासाठी या संस्थेचे तीन वरिष्ठ अध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक / मुख्य सल्लागार, संशोधक अधिकारी, सहाय्यक, तपासणीस, प्रशासकीय सहाय्यक अशा ३० अधिकारी व कर्मचारी यांची एक टीम काम करणारा आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढील ९ महिन्यांत कोस्टल रोड बाधित मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे सर्वेक्षण व अभ्यास करून नुकसान भरपाई देण्यासाठी आवश्यक मसुदा धोरण आणि आराखडा तयार करणार आहे. त्यासाठी पालिकेकडून १ कोटी ५० लाख रुपये अंदाजित खर्च करणे अपेक्षित आहे. तर टाटा इन्स्टिट्यूटने हे काम १ कोटी ४४ लाख २३ हजर ८३० रुपये म्हणजे अंदाजित रकमेपेक्षा कमी किमतीत काम करण्याची तयारी दाखवली आहे.

Comments
Add Comment

एसटीला वर्षाला मिळणार दीड हजार कोटींचे उत्पन्न, काय आहे योजना?

एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई: एसटी महामंडळ कामगारांच्या

सिंधुदुर्गातील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला गती : मंत्री ॲड.आशिष शेलार

नांदोश गढीचे उत्खनन, रामगड ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्याचा निर्णय मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा हा

मेट्रो ३ मार्गिकेचा लोकार्पण सोहळा: मुंबईकरांना मिळणार जलद आणि सोयीस्कर प्रवास

मुंबई :  मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासासाठी एक ऐतिहासिक आणि महत्वाचा बदल घडणार आहे. आता, आरे रोड ते कफ परेड दरम्यान

अक्षय कुमारमुळे महाराष्ट्रातील पोलिसांच्या गणवेशात बदल होणार ? काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मुंबई : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्की या संस्थेसाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय

व्हॉट्अ‍ॅपवर नंबर नाही; आता दिसेल ‘युजरनेम’

मुंबई (प्रतिनिधी) : प्रायव्हसीची (गोपनीयतेची) काळजी घेणाऱ्यांसाठी एक मोठी आणि चांगली बातमी आहे. लवकरच व्हॉट्अ‍ॅप

गुरुवारी राज्यातील ओला, उबर सेवा बंद

कॅब-रिक्षाचालक जाणार संपावर मुंबई (प्रतिनिधी) : परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी