कल्याण-डोंबिवलीत शेअर रिक्षा भाडे जैसे थे!

कल्याण (प्रतिनिधी): कल्याण-डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी सुरूच आहे. कल्याण उप प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) रिक्षाचालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी शेअर रिक्षा भाडे निश्चितीचे दरपत्रक प्रसिद्ध केले आहे. मात्र या दरपत्रकाला रिक्षाचालकांनी केराची टोपली दाखवली आहे.



लॉकडाउनच्या काळापासून रिक्षाचालकांनी भाडे दरात वाढ केली असून, ही दरवाढ कमी करण्यास रिक्षाचालक आजही तयार नाहीत. कल्याण उप प्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षाचालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी शेअर रिक्षाभाडे निश्चितीचे दरपत्रक प्रसिद्ध केले आहे. मात्र हे दरपत्रक अद्याप कागदावर असून, सोमवारी रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून किमान वीस रुपये भाडे आकारले. नऊ रुपये नाही, तर दहा रुपये देणाऱ्या ग्राहकांनाही रिक्षात बसू दिले जात नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आरटीओकडू केवळ सांगितले जात आहे. मात्र ना दर कमी झाल्याचे दिसले, ना कारवाई झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रिक्षाचालकांची मुजोरी कायम असल्याचे दिसून येते.



मुंबई महानगरक्षेत्र परिवहन प्राधिकरण यांनी शेअर रिक्षा किमान भाडे २१ रुपये निश्चित केले असून, त्यानुसार कल्याण उप प्रादेशिक परिवहन हद्दीतील शेअर रिक्षाभाडे दर आरटीओकडून लागू करण्यात आले. बुधवारीच हे नवीन दर लागू झाले असून काही हरकतींचा विचार करत शुक्रवारी रात्री कल्याण आरटीओने सुधारित दरपत्रक समाज माध्यमातून व्हायरल केले. कोरोनापूर्वी किमान रिक्षाभाडे हे आठ रुपये होते. सुट्या पैशांचे कारण पुढे करीत रिक्षाचालक मनमानी पद्धतीने सर्रास दहा रुपये आकारत होते. तेच प्रवाशांकडे आठ रुपये देण्यासाठीही जवळ एक ते दोन रुपये सुट्टे नसतील तर वाद घालताना दिसत होते.



शेअर भाडेवाढ तर झाली आहेच, मात्र डायरेक्ट रिक्षा करून निश्चित स्थळ गाठायचे म्हटले तरी जेथे पूर्वी वीस रुपये आकारले जायचे, तेथे आज ६० ते ८० रुपये आकारले जात आहेत. आरटीओने सुधारित दरपत्रक लागू करून नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांत ना कोणत्या रिक्षा थांब्यावर दरपत्रक झळकले, ना कारवाई झाल्याचे दिसले. विशेष म्हणजे कोणतेच राजकीय पक्ष यावर बोलायला तयार नाहीत, किंवा नागरिकांसाठी आवाज उठवताना दिसत नाही.

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील