प्रहार    

राहुल गांधींच्या वक्तव्याची राज ठाकरेंनी उडवली खिल्ली

  106

राहुल गांधींच्या वक्तव्याची राज ठाकरेंनी उडवली खिल्ली

नाशिक (प्रतिनिधी) : राहुल गांधींच्या ‘मी हिंदू’ या वक्तव्याची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली असून, देशांत हिंदूंचे सरकार आणायचे आहे, या राहुल गांधींच्या वक्तव्यावर, ‘मग आता काय आफ्रिकन लोक राज्य करत आहेत का?’ असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
देशात २०१४ पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे. हिंदू सत्तेबाहेर आहेत. या हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून हटवून हिंदूंना सत्तेवर आणायचे आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारवर हल्ला चढवला. राहुल गांधींच्या या वक्तव्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे. दरम्यान देशात आता काय आफ्रिकन लोकं राज्य करत आहेत का? असा मिश्कील सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.



आम्हाला घाबरवले जाऊ शकत नाही. आम्ही मृत्यूला भीत नाही. हिंदुत्ववाद्यांना फक्त सत्ता हवी आहे, सत्य नाही. त्यांचा मार्ग सत्याग्रह नसून ‘सत्ता’ग्रह आहे. हिंदू आपल्या भीतीचा सामना करतो, तो शिव शंकराप्रमाणे आपली भीती प्राशन करून टाकतो. मात्र, हिंदुत्ववादी भीतीत जगत असतात, असे राहुल गांधींनी म्हटले होते. राहुल गांधींच्या या हिंदुत्ववादी विधानावरून राज ठाकरे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

Comments
Add Comment

मनसेच्या संदीप देशपाडेंनी उडविली गुजराती भाषिकांची खिल्ली

‘कबुतरखाना’वरून गुजराती भाषिक, जैन विरुद्ध स्थानिक मराठी वादाची झालर मुंबई : मराठी अस्मितेच्या लढ्यात उतरलेली

बेस्टच्या पतपेढीची निवडणूक यंदा गाजणार

ठाकरेंच्या पॅनलला राणे, दरेकर, लाड, पावसकर यांचे आव्हान मुंबई : दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या

मेट्रो मार्ग क्रमांक ४ मध्ये यशस्वीरीत्या उभारला स्टील स्पॅन

मुंबई : मेट्रो मार्ग क्रमांक ४ मध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून, मुंबई महानगर प्रदेश विकास

Dadar Kabutar Khana : "कबुतरखाना वाद तापला! जैन समाजाला मराठी एकीकरण समितीची थेट चेतावणी"

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबुतरखान्याच्या (Dadar Kabutar Khana) प्रकरणावरून सध्या

पोकोचा एम ७ प्लस 5जी भारतात १३ ऑगस्टला होणार लाँच

मुंबई : पोकोकडून एम 7 प्लस 5जी भारतात लॉन्च होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 13 ऑगस्ट रोजी

शिवसेना महिला शाखाप्रमुखाला उबाठाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घटनेची दखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

मुंबई: वरळीतील शिवसेना शाखा क्र. १९८ च्या महिला शाखाप्रमुख पूजा बरिया यांना काल उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडून