ठाण्यात भटक्या कुत्र्याची दहशत

ठाणे (वार्ताहर) : ठाण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. ठाण्यातील सावरकर नगर, म्हाडा आणि पाटीलवाडी भागात एका पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी सुमारे १५ जणांचा चावा घेतल्याची घटना घडली आहे.
यामध्ये ३ ते ४ लहान मुलांचा देखील समावेश आहे. या कुत्र्याला पकडण्यासाठी आरोग्य विभागाची गाडी पाचरण करण्यात आली, दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत या कुत्र्याचा शोध सुरू होता. अखेर संध्याकाळी उशिरा हा कुत्र्याला पकडण्यात ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला यश आले.



दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून याचा नाहक त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. त्यात आता सावरकर नगर भागात सोमवारी सकाळी ११.३० वाजता पासून एका पिसळलेल्या कुत्र्याने येथील नागरिकांना भयभीत करून सोडल्याचे दिसून आले. या पिसाळलेल्या कुत्र्याने कोणाच्या हाताला, कोणाच्या पायाला चावा घेऊन पळ काढला. यात तीन ते चार लहान मुलांचा देखील समावेश आहे. या भागातील सुमारे ३४ जणांना त्यांनी चावा घेतल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या कुत्र्याला अखेर सांयकाळी उशिरा या कुत्र्याला पकडण्यात यश आले. दरम्यान तब्बल ३४ जणांना चावा घेतल्यामुळे भटक्या कुर्त्यांची दहशद पुन्हा एकदा ठाणेकरांमध्ये पसरली आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल