लावालावी बंद करा, पक्ष गळतीकडे लक्ष द्या

कोल्हापूर (प्रतिनिधी): आग लावण्याचे धंदे बंद करावेत आणि शिवसेनेला लागलेल्या गळतीकडे अधिक लक्ष द्यावे. नुसती टीका करून पक्ष वाढणार नाही, असा सल्ला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत दिला आहे.


केंद्रीयमंत्री नारायण राणे सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपने देशातील ऐक्य तोडण्याचे काम केले. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा एकही नेता आता भाजपमध्ये नसल्याचे विधान संजय राऊत यांनी केले आहे, त्यावर प्रतिक्रिया काय असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्यावर, मी भाजपमध्ये आहे. कोणकोणापेक्षा लहान आहे. याच मूल्यमापन मी करणार नाही, असे म्हणत राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले.



राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर...


म्हाडा परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर दुसरे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर राज्यात सरकार अस्तित्वात आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच गेल्या दोन वर्षात राज्य दहा वर्षांनी मागे गेले आहे. म्हाडा पेपरफुटीवर तसेच राज्यातील एकूणच पेपरफुटीच्या प्रकरणावर भ्रष्टाचार झाल्याचे राणे यांनी म्हटले.



दोन वर्षांत राज्य १० वर्षे पिछाडीवर


राज्यात सरकार अस्तित्वातच नाही. शेतकऱ्यांचा, मजुरांचा, विद्यार्थ्यांचे प्रश्न अनुत्तरीत आहेत. विकास ठप्प झाला आहे. सरकारचा प्रमुखच नसेल तर यंत्रणेवर कोणाचा अंकुश असणार, असा सवाल देखील नारायण राणे यांनी उपस्थिती केला आहे. राज्याची परिस्थिती सध्या कठीण आहे. महविकास आघाडीमुळे राज्य १० वर्षे मागे गेले आहे. सरकारवर कोणाचा अंकुश राहिला नाहीय. यामुळे पैसे देऊन पेपरफुटत आहेत. यामुळे भ्रष्टाचार देखील वाढला आहे, असे देखील नारायण राणे म्हणाले.

Comments
Add Comment

माथेरानमध्ये धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लूट

कदम दाम्पत्याला दोरीने बांधून चोरटे फरार माथेरान (वार्ताहर): पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये टी स्टॉलवर

Pune School Holiday: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 19 जानेवारीला शाळांना सुट्टी, मुख्य रस्ते बंद,ग्रँड टूरमुळे शहरात...

पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना रजा देण्यात

कोल्हापूर ACB मधील DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात; दोन जणांचा मृत्यू, चित्रदुर्गमध्ये उपचार सुरू

चित्रदुर्ग : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वाहनाला

Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई

नागपूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई करत

कोल्हापुरात प्रसुतीनंतर डिस्चार्ज घेऊन घरी जाताना अपघात, बाळंतीणचा मृत्यू, सात दिवसांचं बाळ जखमी, PI ची तडकाफडकी बदली

कोल्हापूर : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर कानडेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नेसरी पोलीस ठाण्यातील

Mumbai - Pune Expressway : अटल सेतुपासुन थेट पुण्यापर्यंत ९० मिनिटात,नक्की मार्ग काय ?

Mumbai - Pune Expressway : मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांरीकांना मोठा