लावालावी बंद करा, पक्ष गळतीकडे लक्ष द्या

  96

कोल्हापूर (प्रतिनिधी): आग लावण्याचे धंदे बंद करावेत आणि शिवसेनेला लागलेल्या गळतीकडे अधिक लक्ष द्यावे. नुसती टीका करून पक्ष वाढणार नाही, असा सल्ला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत दिला आहे.


केंद्रीयमंत्री नारायण राणे सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपने देशातील ऐक्य तोडण्याचे काम केले. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा एकही नेता आता भाजपमध्ये नसल्याचे विधान संजय राऊत यांनी केले आहे, त्यावर प्रतिक्रिया काय असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्यावर, मी भाजपमध्ये आहे. कोणकोणापेक्षा लहान आहे. याच मूल्यमापन मी करणार नाही, असे म्हणत राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले.



राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर...


म्हाडा परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर दुसरे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर राज्यात सरकार अस्तित्वात आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच गेल्या दोन वर्षात राज्य दहा वर्षांनी मागे गेले आहे. म्हाडा पेपरफुटीवर तसेच राज्यातील एकूणच पेपरफुटीच्या प्रकरणावर भ्रष्टाचार झाल्याचे राणे यांनी म्हटले.



दोन वर्षांत राज्य १० वर्षे पिछाडीवर


राज्यात सरकार अस्तित्वातच नाही. शेतकऱ्यांचा, मजुरांचा, विद्यार्थ्यांचे प्रश्न अनुत्तरीत आहेत. विकास ठप्प झाला आहे. सरकारचा प्रमुखच नसेल तर यंत्रणेवर कोणाचा अंकुश असणार, असा सवाल देखील नारायण राणे यांनी उपस्थिती केला आहे. राज्याची परिस्थिती सध्या कठीण आहे. महविकास आघाडीमुळे राज्य १० वर्षे मागे गेले आहे. सरकारवर कोणाचा अंकुश राहिला नाहीय. यामुळे पैसे देऊन पेपरफुटत आहेत. यामुळे भ्रष्टाचार देखील वाढला आहे, असे देखील नारायण राणे म्हणाले.

Comments
Add Comment

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या