जगन मोहन रेड्डींनी घेतली कोरोना विषयक आढावा बैठक

Share

अमरावती (हिं.स) : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी मुख्यमंत्री सचिवालयात राज्याच्या कोरोना विरुद्ध सुरु अभियानाचा आढावा घेतला. (Jagan Mohan Reddy holds Corona Review Meeting)

यावेळी कोरोना निवारण, उपचार, कोरोना प्रबंधन, दैनंदिन लसीकरण, कोरोना प्रतिबंध, ओमायक्रॉन प्रकार तसेच नाडू-नेडू सारख्या विषयांवर चर्चा आणि मंथन झाले. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी यावेळी आवश्यक माहिती जाणून घेतली तसेच संबंधित मंत्रालय आणि अधिका-यांना-प्रशासनास दिशानिर्देश दिले.

रविवारी आंध्रप्रदेशमध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराचा शिरकाव झाला. आयर्लंड देशातून परत आलेल्या एका ३४ वर्षाच्या नागरिकास ओमायक्रॉनचा संसर्ग झाला असून राज्यातील हा ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आहे. बाधित नागरिकांना कोणतेच लक्षणं नसून ते सध्या देखरेखीत आहे.

राज्य शासन आणि प्रशासनाने नागरिकांना कोरोना नियमांचे योग्य पालन करण्याचे तसेच लसीकरण पूर्ण करून घेण्याचे आवाहन केले आहे. तिरुपती येथे ओमायक्रॉनचा कुठलाच रुग्ण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून अफवा आणि खोट्या वार्ता प्रसारित करण्यापासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तसे केल्यास संबंधित दोषीस कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी ताकीद दिली आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

1 hour ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

2 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

2 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

3 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

4 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

4 hours ago