नवाब मलिक यांची हायकोर्टात बिनशर्त माफी

मुंबई : महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या संदर्भात बोलू नये असे न्यायालयीन निर्देश असूनही मंत्र्यांनी त्याचे उल्लंघन केले होते. याचप्रकरणी त्यांना हा माफीनामा द्यावा लागलाय.

राज्य सरकारचे मंत्री वानखेडे कुटुंबियांना जाहीरपणे लक्ष्य बनवित असल्याने ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी नवाब मलिक यांनी कोर्टात हमीपत्र दिले होते की, ते समीर वानखेडे यांच्याबाबत बोलणार नाहीत. परंतु, रविवारी ५ डिसेंबर रोजी ट्विटर स्पेसवर आयोजित पत्रकार परिषदेत मलिकांनी वानखेडे यांच्याविषयी भाष्य केले होते. त्याचप्रमाणे मलिकांनी दादर येथील चैत्यभूमीवरही वानखेडे यांना उद्देशून वक्तव्य केले होते. त्यामुळे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. वानखेडे यांच्याविषयी न बोलण्याचे प्रतित्रापत्र न्यायालयात देऊनही त्यांनी वक्तव्य केल्याचे यामध्ये म्हटले होते. त्यावर उच्च न्यायालयाने मंगळवारी ७ डिसेंबर रोजी मंत्री नवाब मलिकांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते.


त्यानुसार आज, शुक्रवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत नवाब मलिक यांचे वकील ऍस्पि चिनॉय यांनी न्यायालयात सांगितले की, मलिक यांनी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधाने केलेली नाहीत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्याबद्दल बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे विधाने करणार नाही, अशी हमी देतो, अशी बाजू मलिक यांनी मांडली आहे.



मुंबई : महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या संदर्भात बोलू नये असे न्यायालयीन निर्देश असूनही मंत्र्यांनी त्याचे उल्लंघन केले होते. याचप्रकरणी त्यांना हा माफीनामा द्यावा लागलाय.

राज्य सरकारचे मंत्री वानखेडे कुटुंबियांना जाहीरपणे लक्ष्य बनवित असल्याने ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी नवाब मलिक यांनी कोर्टात हमीपत्र दिले होते की, ते समीर वानखेडे यांच्याबाबत बोलणार नाहीत. परंतु, रविवारी ५ डिसेंबर रोजी ट्विटर स्पेसवर आयोजित पत्रकार परिषदेत मलिकांनी वानखेडे यांच्याविषयी भाष्य केले होते. त्याचप्रमाणे मलिकांनी दादर येथील चैत्यभूमीवरही वानखेडे यांना उद्देशून वक्तव्य केले होते. त्यामुळे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली होती. वानखेडे यांच्याविषयी न बोलण्याचे प्रतित्रापत्र न्यायालयात देऊनही त्यांनी वक्तव्य केल्याचे यामध्ये म्हटले होते. त्यावर उच्च न्यायालयाने मंगळवारी ७ डिसेंबर रोजी मंत्री नवाब मलिकांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते.


त्यानुसार आज, शुक्रवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत नवाब मलिक यांचे वकील ऍस्पि चिनॉय यांनी न्यायालयात सांगितले की, मलिक यांनी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधाने केलेली नाहीत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्याबद्दल बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे विधाने करणार नाही, अशी हमी देतो, अशी बाजू मलिक यांनी मांडली आहे.

Comments
Add Comment

मुंबईत आता जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात होणार नाही पाणीकपात, महापालिकेने असे घेतले हाती काम...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीच्या काळामध्ये

भारत सागरी सप्ताह २०२५ मध्ये ५५,९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार

भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकारातून समृद्धी आणणार: मंत्री अमित शाह

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण मुंबई : सहकाराच्या माध्यमातून

भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कार्यालय हे मंदिरासमान

भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन मुंबई : भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी

केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या छोट्या बच्चूंसाठी गायिका डॉ अनुराधा पौडवाल यांनी दिला असा मदतीचा हात...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयासाठी आता विख्यात गायिका

एसबीआयकडून मोठ्या प्रमाणावर भरती: ३,५०० अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि